शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

जेवण करून जा, पण पाणी नका मागू ! मराठवाड्यात पाणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 06:27 IST

डोक्यावर कायम पाण्याचा हंडा असलेल्या पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक गावात प्रत्येक कुटुंबाला वर्षाला केवळ पाण्यावरच जवळपास ३० हजार रुपये खर्च करावे लागतात

अंकुश वाघ

आडूळ (जि. औरंगाबाद) : डोक्यावर कायम पाण्याचा हंडा असलेल्या पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक गावात प्रत्येक कुटुंबाला वर्षालाकेवळ पाण्यावरच जवळपास ३० हजार रुपये खर्च करावे लागतात. जेवण करून जा, पण पाणी नका मागू, असे सांगण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.

आडूळ बुद्रुक मुख्य बाजारपेठेचे १५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात पाच शासकीय टँकर सुरू आहेत. सार्वजनिक विहिरीत पाणी टाकले जाते आणि तब्बल २५ दिवसांआड नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे सर्वांना खासगी टँकरद्वारे दररोज ७० रुपये प्रति ड्रम व पाच रुपये प्रति हंडा दराप्रमाणे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. एका कुटुंबाला महिन्याकाठी फक्त पाण्यावर साधारण अडीच हजार रुपये लागतात. अनेक जण आठवडाभर विनाआंघोळीचे राहतात. आंघोळीचे पाणी कपडे धुण्यासाठी वापरले जाते.

पाणी योजनेसाठी पाठपुरावा सुरू असून ठेकेदाराला विचारणा केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायतीला सामोरे जावे लागत आहे. - शेख शमीम नासेर, सरपंच, आडूळ

खोडेगाव येथील डीएमआयसीचा पाणी पुरवठ्याचा पॉईंट सुरू होणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल. - बळीराम कळमकर, ग्रामविकास अधिकारी, आडूळ

योजना रखडली२०१८ मध्ये दोन कोटी नऊ लाख रुपयांच्या मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. या कामाचा कार्यारंभ आदेशसुद्धा निघाला आहे. परंतु प्रशासन व ठेकेदारामुळे ही योजना रखडली आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईAurangabadऔरंगाबादWaterपाणी