शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

जेवण करून जा, पण पाणी नका मागू ! मराठवाड्यात पाणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 06:27 IST

डोक्यावर कायम पाण्याचा हंडा असलेल्या पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक गावात प्रत्येक कुटुंबाला वर्षाला केवळ पाण्यावरच जवळपास ३० हजार रुपये खर्च करावे लागतात

अंकुश वाघ

आडूळ (जि. औरंगाबाद) : डोक्यावर कायम पाण्याचा हंडा असलेल्या पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक गावात प्रत्येक कुटुंबाला वर्षालाकेवळ पाण्यावरच जवळपास ३० हजार रुपये खर्च करावे लागतात. जेवण करून जा, पण पाणी नका मागू, असे सांगण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.

आडूळ बुद्रुक मुख्य बाजारपेठेचे १५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात पाच शासकीय टँकर सुरू आहेत. सार्वजनिक विहिरीत पाणी टाकले जाते आणि तब्बल २५ दिवसांआड नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे सर्वांना खासगी टँकरद्वारे दररोज ७० रुपये प्रति ड्रम व पाच रुपये प्रति हंडा दराप्रमाणे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. एका कुटुंबाला महिन्याकाठी फक्त पाण्यावर साधारण अडीच हजार रुपये लागतात. अनेक जण आठवडाभर विनाआंघोळीचे राहतात. आंघोळीचे पाणी कपडे धुण्यासाठी वापरले जाते.

पाणी योजनेसाठी पाठपुरावा सुरू असून ठेकेदाराला विचारणा केल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायतीला सामोरे जावे लागत आहे. - शेख शमीम नासेर, सरपंच, आडूळ

खोडेगाव येथील डीएमआयसीचा पाणी पुरवठ्याचा पॉईंट सुरू होणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल. - बळीराम कळमकर, ग्रामविकास अधिकारी, आडूळ

योजना रखडली२०१८ मध्ये दोन कोटी नऊ लाख रुपयांच्या मुख्यमंत्री राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. या कामाचा कार्यारंभ आदेशसुद्धा निघाला आहे. परंतु प्रशासन व ठेकेदारामुळे ही योजना रखडली आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईAurangabadऔरंगाबादWaterपाणी