शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पुणतांब्यातील आंदोलक मुलींची रुग्णालयात रवानगी; पोलिसांनी बळजबरीनं कारवाई केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 7:31 AM

शेतकरी कन्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस; पोलिसांच्या कारवाईमुळे गावात तणाव

अहमदनगर: पुणतांब्यातील आंदोलनकर्त्या मुलींना रात्री उशिरा पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. यावरुन पुणतांब्यात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी बळजबरीनं ही कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या पाच दिवसांपासून पुणतांब्यातील शेतकरी कन्यांचं विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सर्व मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा इशारा या मुलींनी दिला आहे. मात्र मध्यरात्री मुलींना रुग्णालयात दाखल करुन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कृषीसंलग्न वस्तुंवरील जीएसटीतून माफी, सुक्ष्मसिंचन, कृषी अवजारांवरांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव, दुधाचे दर वाढून मिळावेत, अशा अनेक मागण्यांसाठी पुणतांब्यातील तीन मुलींनी अन्यत्याग आंदोलन सुरू केलं. आज या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. मात्र अद्याप तरी याबद्दल कोणताही तोडगा निघालेला नाही. काल पालकमंत्री राम शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली.अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शुभांगी जाधव या मुलीला अस्वस्थ वाटू लागल्यानं तिला रात्री अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर पोलिसांनी तिच्या सोबत आंदोलन करत असलेल्या मुलींचीही रुग्णालयात रवानगी केली. मुलींची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र पोलिसांनी बळजबरीनं कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. रात्री दीड वाजता पोलिसांनी आंदोलनकर्त्या मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केलं. यावेळी काही ग्रामस्थांनादेखील ताब्यात घेण्यात आलं. यामुळे पुणतांब्यात मोठा तणाव निर्माण झाला. त्यानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनAhmednagarअहमदनगर