शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

गरिबांच्या मुलींची ब्रिटिशकालीन जि.प.ची कन्या शाळा तोडून नामशेष करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 20:59 IST

शहरातील गरीब मुलींसाठी येथील जिल्हा परिषदेची कन्या शाळा ब्रिटीशकालीन आहे. मात्र तिला तोडून येथील विद्यार्थिनी व बी.जे. हायस्कूलचे विद्यार्थी अन्य शाळेत स्थलांतरित करणार आहे.

ठाणे : शहरातील गरीब मुलींसाठी येथील जिल्हा परिषदेची कन्या शाळा ब्रिटीशकालीन आहे. मात्र तिला तोडून येथील विद्यार्थिनी व बी.जे. हायस्कूलचे विद्यार्थी अन्य शाळेत स्थलांतरित करणार आहे. मुख्य कार्यकारी विवेक भीमनवार यांनी विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी कन्या शाळे विषयी विचारले असता ही शाळाच सहा महिन्यांच्या कालावधीत तोडणार असल्याचे यावेळी उघड झाले.येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेने पत्रकार परिषद घेऊन कामकाजासह विकासाचा आढावा उघड करण्यात आला. ग्रामीण भागातील सुमारे एक हजार ३६३ शाळा शंभर टक्के डिजिटल केल्याचा दावा करताना ९५० शाळा देखील प्रगत केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. यास अनुसरून शहरात असलेली ब्रिटिशकालीन जिल्हा परिषदेची कन्या शाळा डिजिटल का झाली नाही, या विषयी विचारले असता ही शाळा तोंडणार असल्याचे भीमनवार यांच्यासह शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले. शाळा तोडल्यानंतर संबंधित भूखंडाचा वापर कशासाठी करणार, यावर मात्र समाधानकारक उत्तर देता आले नाही. जिल्हा परिषदेत येणा-या लोकप्रतिनिधींची बॉडी या भूखंडाचा काय तो विचार करणार असल्याचे शेंडकर यांनी सांगितले.चांगल्या कामांमुळे राज्यपालांनी पुरस्कृत केलेल्या शेंडकर यांना जिल्हा परिषदेची ही कन्या शाळा ठाणे महापालिकेत वर्ग करण्यात आल्याचा प्रश्न विचारण्यात आला. यावर ‘आम्ही तर काही प्रस्ताव दिलेला नाही ’ असे सांगून त्यावर अधिक बोलणे टाळले. शाळेच्या या भूखंडाचा वापर कशासाठी करणार... मुलांना अन्य शाळेत स्थलांतरित करणार... यावरून शाळेचे विद्यार्थी महापालिकेसह अन्य शाळांमध्ये समाविष्ट होणा-या शिक्षणाधिका-यांना याची भनक नसणे योग्य नसल्याचे निदर्शनात आले. महिला व मुलींच्या सबलीकरणासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत. पण गरीब, दीन दलितांच्या मुली शिक्षण घेत असलेली कन्या शाळा तोडून हा भूखंड जिल्हा परिषद मोकळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून उघड झाले. ‘लेक शिकवा’ असे शासनाचे उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद ग्रामीण भागाप्रमाणे कन्या शाळेला डिजिटल न करता तिला आगामी सहा महिन्यांत तोडण्याचे नियोजन करीत आहे. यामुळे हक्काच्या शाळेपासून वंचित होणा-या ठाणे शहरातील सावित्रीच्या लेकींना शहरातील महागड्या शाळेत शिकणे शक्य नसल्याचे उघड होत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा करणा-या जिल्हा परिषदेच्या सुमारे दहा शाळा मागील वर्षात बंद पडल्याचे या पत्रकार परिषदेत उघड झाले. विद्यार्थी संख्येअभावी दुस-याजवळच्या तीन किलोमीटरच्या शाळेत या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले. शासनाच्या धोरणानुसार दरवर्षी हा कार्यक्रम राबवताना विद्यार्थ्याच्या वाहन व्यवस्थेची देखील काळजी घेतली जात असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. जिल्ह्यात ९५ हजार शौचालये बांधून जिल्हा शंभर टक्के हगणदारीमुक्त होत आहे, नादुरुस्ती शौचालयांची दुरुस्ती करण्यात आली, ६५ ग्रामपंचायतींच्या विकासकामांचे आराखडे तयार झाले, गावातील शाळांच्या वीज पुरवठ्याचे बिल भरण्यासह साफसफाई व शौचालयांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर सोपवण्यात आली.घरकूल बांधणीत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असून बहुतांशी घरकूल बांधून पूर्ण झाले. विविध करणांनी रखडलेल्या सुमारे १८८ पाणी पुरवठा योजनांचे कामे पूर्ण करण्यात आले. सॅम, मॅमचे बालके कुपोषणातून मुक्त करण्याची प्रगती आदी विविध विषयांची माहिती भीमनवार यांनी देऊन जिल्हा परिषदेच्या प्रगतीचा आढावा पत्रकारांसमोर उघड केला. यावेळी भरारी या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :Schoolशाळा