शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

काळ्याबाजारावर टाच आल्याने योजनाच बंद पाडण्याचा डाव - गिरीश बापट

By अतुल कुलकर्णी | Updated: April 21, 2018 01:03 IST

रेशन दुकानातील ई-पॉस मशीनमुळे १० लाखांहून अधिक शिधापत्रिका बोगस आढळून आल्या, तर रेशन दुकानदारांनी ३८ हजार मे. टन धान्य कमी उचलले. या यंत्रणेमुळे रेशन दुकानातील धान्यांच्या काळ्याबाजारावर टाच आणल्यामुळे धाबे दणाणलेल्या दुकानदारांनी ही यंत्रणाच मोडून काढण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

मुंबई : रेशन दुकानातील ई-पॉस मशीनमुळे १० लाखांहून अधिक शिधापत्रिका बोगस आढळून आल्या, तर रेशन दुकानदारांनी ३८ हजार मे. टन धान्य कमी उचलले. या यंत्रणेमुळे रेशन दुकानातील धान्यांच्या काळ्याबाजारावर टाच आणल्यामुळे धाबे दणाणलेल्या दुकानदारांनी ही यंत्रणाच मोडून काढण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.नव्या यंत्रणेमुळे गोरगरिबांच्या घरात जाणारे धान्य काळ्या बाजारात विकता येईना म्हणून रेशन दुकानदारांनी राजकीय पक्षांना हाताशी धरून आंदोलन सुरू केले आहे. जे लोक ई-पॉस मशीन परत करतील त्यांच्या दुकानाचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नुकताच मुंबई, ठाण्यातील काही रेशन दुकानदारांनी मोर्चा काढून ई-पॉस मशीन परत केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षातएकही मशीन परत आलेले नाही, असे सांगून बापट म्हणाले, सर्वाेच्च न्यायालयाने स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी ‘आधार’चा आधार घेण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्याने नोटिफिकेशनही काढले आहे. तरीही जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवली जात असल्याचे बापट म्हणाले.अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या ७ कोटी लाभार्थ्यांपैकी ८७ टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग करण्यात आले आहे. तर १०० टक्के शिधापत्रिकांचे डिजिटायझेशन झाले आहे. राज्यात एकूण ५२,३८१ रास्तभाव दुकानांमध्ये मायक्रो एटीएम दर्जाच्या पॉस मशीन बसविण्यात आल्या आहेत. त्यातून बायोमेट्रिक ओळख पटवून धान्याचे वितरण सुरू झाले. मात्र ही व्यवस्था कार्यान्वित होईपर्यंत ही यंत्रणा आपल्या गैरकारभाराच्या मुळावर येणार आहे याची जाणीव दुकानदारांना झाली नव्हती. त्यामुळे जानेवारीत ४३ टक्के तर फेब्रुवारीत ६१ टक्के व्यवहार या यंत्रणेमार्फत झाले.जालना, वाशिम, भंडारा, वर्धा, कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, अकोला, सांगली, अहमदनगर, परभणी, नागपूर, लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद येथे १०० टक्के धान्य वाटप आधारला लिंक करून झाले. त्यामुळे आपल्याला आता बोगस धान्य विकता येणार नाही, हे लक्षात आल्यानंतर याविरुद्ध दुकानदारांचे आंदोलन सुरू झाले आहे, असे बापट म्हणाले.

टॅग्स :girish bapatगिरीष बापट