शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"स्थापनेपासून 'त्या' पक्षाला काही..."; उद्धव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 13:43 IST

ज्यांना पराभव जिव्हारी लागतो तोच उद्या इतिहास घडवू शकतो. आपल्याला उद्याचा इतिहास घडवायचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

मुंबई - तुमच्यासारखे कार्यकर्ते मरमर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही. पराभव ज्यांच्या जिव्हारी लागतो तोच इतिहास घडवू शकतो. तुम्ही ज्या पक्षातून आलात त्याला ना हेतू आहे ना दिशा असं भाष्य करत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसे प्रमुख राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. घाटकोपर येथील मनसे कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. 

या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे एक है तो सेफ है..आता हाच प्रश्न मला मराठी माणसांना विचारायचा आहे. उद्याची मुंबई आपली राहणार आहे का? शहरात असे बरेच गृहनिर्माण प्रकल्प आहेत जिथे आपल्या हक्काची मुंबई डोळ्यादेखत ओरबडून नेली जातेय अशावेळी आपण षंढ म्हणून बघत बसणार का? तुम्ही कोणत्या पक्षातून आलात त्याबद्दल मला बोलायचं नाही पण पक्ष स्थापन केल्यापासून पक्षाला काही हेतू लागतो. दिशा लागते ती काहीच नाही. अशावेळी तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर मेहनत करतात. त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही असा निशाणा त्यांनी मनसेवर साधला. 

तसेच  १५ दिवसांपूर्वीच निकाल लागलाय, निकाल लागल्यानंतर तुम्ही शिवसेनेत येताय. जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोष नाही तुम्ही इथं जल्लोषात प्रवेश करताय. जिंकलेल्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाही म्हणजेच त्या विजयात काहीतरी घपला आहे. बरेच घोटाळे आहेत. तुम्ही सगळे एकत्र आलात ते योग्य वेळी आला. जिंकल्यानंतर सगळे येतात पण हरल्यानंतर कुणी येत नाही. ज्यांना पराभवाची खंत असते. ज्यांना पराभव जिव्हारी लागतो तोच उद्या इतिहास घडवू शकतो. आपल्याला उद्याचा इतिहास घडवायचा आहे. आज तुम्ही सगळे शिवसेनेत आलात. मी शिवसेना एकच मानतो. शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला दुसऱ्या कुणाला देण्याचा अधिकार नाही हे मी उघडपणे तेव्हाही सांगितले आजही सांगतोय. फक्त निशाणी बदललीय. निशाणी बदलल्यानंतरही आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरत होतो तेव्हा सर्वजण म्हणायचे उद्धवजी, तुम्हीच येणार. जे काही सर्व्हे सुरू होते त्यात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण होता, मग त्याची दांडी कशी उडाली असं उद्धव ठाकरेंनी विचारले. 

दरम्यान, हे सगळे चोरांचे, दरोडेखोरांचे राज्य आहे ते उलथावून टाकावेच लागेल. ठिणगी पडली आहे. आता तुम्हाला झोपून चालणार नाही कारण आता मुंबईतील मराठी माणसांचा, महाराष्ट्र धर्माचा आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि योग्यवेळी तुम्ही शिवसेनेची मशाल आणि भगवा हाती घेतला आहे. तुम्हाला जी काही मदत लागेल, जिथे आमदारांची मदत लागेल तुम्ही ताकदीने येऊन सांगा. तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाShiv Senaशिवसेना