शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

गांधीगिरी : जालन्यात खराब सोयाबीन-कपाशीचे बुके देऊन केले अधिकाऱ्यांचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 5:49 PM

मराठा महासंघाच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी पिकाची पाहणी करण्यासाठी गावात आलेल्या अधिकाऱ्यांचे खराब झालेले सोयाबीन आणि कपाशीच्या झाडांचे बुके देऊन स्वागत केले. तसेच लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली.

जालना - राज्यभरात परतीच्या पावसाने कहर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या परिस्थितीत शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला असून सरकारने लवकरात लवकर मदत द्यावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शासन आणि प्रशासन कागदी घोडे नाचवण्यातच वेळ घालवत असल्याचा आरोप करत मराठा महासंघाने आक्रमक पावित्रा घेतला आहे.

जालना जिल्ह्यातील कारला गावात मंगळवारी तलाठी आणि कृषीअधिकारी नुकसानग्रस्त भागातील पिकांचा पंचनामा करण्यासाठी आले होते. त्यावेळी मराठा महासंघाच्या वतीने अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांना थेट मदत करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा छळ थांबवून कागदीघोडे नाचवणे बंद करावे अशी मागणी मराठा महासंघाच्या विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष  शैलेश देशमुख यांनी केली. 

दरम्यान मराठा महासंघाच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी पिकाची पाहणी करण्यासाठी गावात आलेल्या अधिकाऱ्यांचे खराब झालेले सोयाबीन आणि कपाशीच्या झाडांचे बुके देऊन स्वागत केले. तसेच लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. यावेळी पंचायत समिती सदस्य रामराव काळे, माजी सरपंच एकनाथ खरात, नवनाथ सरोदे आदी उपस्थित होते.