शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 23:36 IST

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ द्वारे पूर्ण मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केली.

CM Devendra Fadnavis Letter: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. मराठवाड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकराकडून मदतीची अपेक्षा केली आहे. सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २२१५ कोटी मंजूर केले असून सगळे निकष बाजूला ठेवून मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. दुसरीकडे, शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र दिलं आहे. 

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागात पिकांसह जमीनच वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशातच महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांसाठी एनडीआरएफ अंतर्गत अतिरिक्त आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र दिलं. एनडीआरएफ निधीमधून जास्तीत जास्त मदत आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

पत्रात काय म्हटलं?

"महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीबद्दल आम्ही तुम्हाला गंभीर चिंता व्यक्त करत लिहित आहोत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीच्या जमिनीचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील ३१ हून अधिक जिल्हे सततच्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीच्या जमिनीवर पिकांचे नुकसान झाले आहे, जे आमच्या शेतकरी समुदायासाठी खूप चिंतेची बाब आहे. ही परिस्थिती विशेषतः आमच्या शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे जे आधीच मागील शेतीच्या अडचणींमधून सावरण्याचा प्रयत्न करत होते. पीक नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी आम्ही राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून २,२१५ कोटी रुपयांची रक्कम वाटप केली आहे. खरीपाच्या अखेरीस (सप्टेंबर २०२५) पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे आतापर्यंत ५० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र सरकारला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीकडून जास्तीत जास्त मदत वाटप करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळेल आणि त्यांचे जीवनमान पुन्हा उभारण्यास मदत होईल," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Give NDRF funds to farmers in crisis: Fadnavis to Shah.

Web Summary : CM Fadnavis requests Amit Shah for NDRF aid after heavy Maharashtra rains devastated crops. State allocates ₹2215 crore from SDRF. Over 50 lakh hectares of crops damaged.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहEknath Shindeएकनाथ शिंदे