शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

यूपीतील माजी सरपंच मुंबईत करायचा घरफोड्या, मीरारोड पोलिसांनी अँटॉपहिल येथे त्याला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:39 IST

मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीला मीरारोड पोलिसांनी मुंबईच्या अँटॉप हिल भागातुन अटक केली आहे.

- धीरज परबमीरारोड - मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात घरफोड्या करणारा सराईत आरोपी आसिफ अब्दुल शेख याला मीरारोड पोलिसांनी मुंबईच्या अँटॉप हिल भागातुन अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील एका ग्रामसभेचा माजी सरपंच असलेल्या आसिफ वर घरफोडीचे सुमारे २० गुन्हे दाखल असुन मुंबई गुन्हे शाखे सह विविध पोलीस ठाण्याांचे पोलीस त्याचा शोध घेत होते.मीरारोडच्या शितल नगर मध्ये राहणारया उषा पुत्रण ह्या आई कडे गेल्या असता त्यांचे बंद घर २२ नोव्हेंबर रोजी चोरट्याने फोडुन घरातील ३० हजार रोख, ८६ ग्रॅमचे सोन्याचे दागीने, दोन एटीएम कार्ड सह अन्य ओळखपत्रे चोरीला गेली होती. दरम्यान या चोरीची कल्पना नसलेल्या पुत्रण यांच्या मुलास एटीएम मधुन ५० हजार रोख काढण्यात आल्याचा संदेश आला असता त्याने आईला विचारणा केली. पण उषा यांनी आपण पैसे काढले नसल्याचे सांगत घराकडे धाव घेतली त्यावेळी चोरी झाल्याचे समजले.या प्रकरणी मीरारोड पोलीसात गुन्हा दाखल झाल्यावर वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक भरत सोनावणे सह विजय ब्राह्मणे, निकम यांनी तपास सुरु केला. आरोपीने ५० हजार रुपयांची रक्कम दहिसर येथील एटीएम मधुन काढल्याचे उघड झाल्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीने चेहरा दिसु नये म्हणुन टोपी घातली होती. परंतु बाहेर असलेल्या कारचा क्रमांक मात्र सापडला.सदर कारच्या क्रमांकाची नोंदणी ज्या नावे होती त्याने कार विकली होती, पण वीमा मात्र पनवेल येथील एका व्यक्तीच्या नावे असल्याने त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता सदरची कार त्याने आपला मित्र आसिफ वापरत असल्याचे सांगीतले.पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या मित्रास आसिफशी संपर्क करायला लावला. आसिफ हा एका टॅक्सीत बसत असल्याचे दिसताच पोलीसांनी त्याचा पाठलाग करत टॅक्सी अडवली. पण आसिफ मात्र दार उघडुन पळु लागला असता त्याला पाठला करुन पोलीसांनी पकडले. गुन्ह्यात वापरलेली कार व कटावणी आदी जप्त करण्यात आली आहे. तो दिवसाच चोरी करायचा.मुळचा विरारचा जन्म असलेला आसिफ हा वयाच्या १४ व्या वर्षा पासुनच घरफोड्या करत आलाय. बंद घर हेरुन तो चोरी करत असे. मग तो आपल्या उत्तरप्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातील रामपुर रजवाडी गावी पळुन जात असे. विमानाने तो ये जा करत असे. काही महिन्याने पुन्हा मुंबई, ठाणे, पालघर भागात येऊन घरफोड्या करत असे.तो २०१० मध्ये गावचा प्रधान म्हणुन पण निवडुन आला होता. प्रधान असताना सुध्दा २०१४ मध्ये त्याला घरफोडी प्रकरणी अटक झाली होती. दिड वर्षा पुर्वी देखील वसईतील चोरी प्रकरणी त्याला युपीच्या एसटीएफ ने अलाहबाद येथुन अटक केली होती. जेल मधुन सुटुन त्याने पुन्हा घरफोड्या सुरु केल्या होत्या. नवी मुंबईत तर एका पोलीसाच्या घरीच त्याने चोरी केली होती.त्याच्यावर नवी मुंबई, दहिसर, नवघर, तुळींज, विरार, बोईसर, वालिव आदी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मुंबई गुन्हे शाखेची युनीट ११ सह विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस त्याचा शोध घेत होते अशी माहिती श्रीकांत पाडुळे यांनी दिली. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र