शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

महाआघाडीत पुन्हा बिघाडी? आव्हाडांच्या इंदिरा गांधींबद्दलच्या 'त्या' विधानानं नव्या वादाला फोडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 22:12 IST

जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं नवा वाद होण्याची शक्यता

मुंबई: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानामुळे महाआघाडीत पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करून देशातल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं वक्तव्य आव्हाड यांनी बीडच्या संविधान महासभेत केलं. या विधानावरुन काँग्रेस हायकमांडकडून काय भूमिका घेतली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.'इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नव्हतं. मात्र अहमदाबाद, पाटण्यातल्या विद्यार्थ्यांनी हिंमत दाखवली होती. यानंतर जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन पुकारलं होतं. आताही देशात तशीच परिस्थिती आहे. जेएनयू, जामिया, जादवपूर विद्यापीठांचे विद्यार्थी सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. ते थेट सरकारला आव्हान देत आहेत. लोकांना कायदा समजवून सांगत आहेत. आता त्यांची संख्या कमी असेल. मात्र यातूनच नवे नेते घडतील,' असं आव्हाड यांनी संविधान महासभेला संबोधित करताना केलं. जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आव्हाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेलादेखील या वादात ओढण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र आव्हाड खरं बोलले. त्यांच्या विधानाशी शरद पवार आणि शिवसेना सहमत असेल, असं सोमय्या यांनी म्हटलं. याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेल्या विधानावरुन मोठा वाद झाला होता. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला पायधुनीमध्ये भेटायला जायच्या, असा खळबळजनक दावा राऊत यांनी लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात केला होता. या विधानाबद्दल काँग्रेसकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. यानंतर राऊत यांनी त्यांचं विधान मागे घेतलं. 

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडIndira Gandhiइंदिरा गांधीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत