शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

माळरानावर फुलविली सेंद्रिय फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 09:01 IST

यशकथा : सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्यांना एकत्र करून उत्पादित शेतीमाल परदेशात पाठविण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

- हेमंत आवारी (अकोले, जि.अहमदनगर)

अकोले तालुक्यातील  बहिरवाडी मुथाळण्याच्या माळरानावर १०० एकर क्षेत्रावर सेंद्रिय फळबाग उभारणीचे काम ६५ वर्षीय विठ्ठल पाडेकर यांनी सुरू केले आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्यांना एकत्र करून उत्पादित शेतीमाल परदेशात पाठविण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

बहिरवाडी येथील विठ्ठल सहादू पाडेकर यांनी एका सेवा संस्थेमार्फत रायगड जिल्ह्यातील कशेळे या आदिवासी पाड्यात स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून रोजगारनिर्मिती आणि स्थानिकांचे सक्षमीकरण यासाठी विविध उपक्रम राबविले होते. त्यात बांबूकाम, औषधी वनस्पतींचे जतन, संवर्धन, सुतारकाम, लोहारकाम गोष्टी शिकवल्या जात. त्यातील फळप्रक्रिया उद्योगाचे ते प्रमुख झाले. कारण त्यांनी म्हैसूर येथे जाऊन ‘फूड टेक्नॉलॉजी’चे प्रशिक्षण घेतले होते. विविध प्रशिक्षणांच्या निमित्ताने जपान, हॉलंड, श्रीलंका, पोलंड देशांमध्ये अभ्यास दौरे केले. याठिकाणीच त्यांनी सुका मोरावळा तयार केला. त्याला ‘आवळा कॅण्डी’ हे नाव दिले. 

कॅण्डी म्हणजे स्टिक; पण आवळा गोल असतो तरीही हे नाव त्यांनी दिले. ही ३५ वर्षांपूर्वीची गोष्ट असून, त्या अर्थाने ते आवळा कॅण्डीचे जनकच होत. त्यांनी स्वत:च्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. बहिरवाडीतच आवळाप्रक्रिया उद्योगास सुरुवात केली. आता ३०० टन वार्षिक उत्पन्नाची क्षमता आहे. फळप्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल तालुक्यात सेंद्रिय पद्धतीने निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न ते गेल्या काही वर्षांपासून करतात. मुथाळण्याच्या डोंगरपठारावर पडीक माळरानात ८५ एकर जमिनीवर त्यांनी आवळा, आंबा, लिंबू, सीताफळ, करवंद, डाळिंब फळझाडांची लागवड केली आहे. 

उन्हाळ्यात मार्चनंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. झाडांना टँकरने पाणी पुरवावे लागते. गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्यावर पाडेकर यांनी स्वखर्चाने पाझर तलाव तयार केला. ७५ फूट उंचीच्या या तलावासाठी ५० फूट पाया घेतलेला आहे. अडीच ते चार कोटी लिटर क्षमतेचे तीन शेततळे तयार करण्यात आले. यावर्षी डाळिंबाचे अडीच हजार, चंदनाची पंधराशे आणि बांबू, गावठी सीताफळ, माला डुबियाची तीन हजार झाडे लावली आहेत. फळबागांच्या लागवडीतून माळावर वनराई फुलविण्याचा त्यांचा मानस आहे.

सेंद्रिय शेतीत गीरगार्इंचे गोपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन केले जाणार असल्याचे पाडेकर शेती बघायला येणाऱ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सांगतात. हल्ली शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कोणी नापिकीला तर कोणी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतोय. मात्र, आत्महत्या हा मार्ग नाही. मनापासून शेती केली तर ती फायद्याचीच आहे, असेही विठ्ठल पाडेकर यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रAhmednagarअहमदनगर