शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

राज्यात कोरोनामुळे परिस्थिती बिकट; पाच टक्के रुग्ण ऑक्सिजनवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 07:31 IST

तीन टक्के रुग्ण गंभीर स्थितीत; मुंबईत सातही सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या मोठ्या टाक्यांची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात रुग्णसंख्येने ११ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, एकूण रुग्णसंख्येत सध्या आॅक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पाच टक्के आहे. याखेरीज, राज्यात रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ९२ टक्के रुग्ण लक्षणेविरहित, सौम्य लक्षणे असलेले आहेत. तर तीन टक्के रुग्ण गंभीर स्थितीत आहेत.

राज्यातील एकूण मृत्यूंमध्ये ६५ टक्के मृत्यू पुरुष रुग्णांचे तर ३५ टक्के महिला रुग्णांचे आहेत. एकूण रुग्णांमध्ये ६१ टक्के प्रमाण पुरुषांचे असून ३९ टक्के प्रमाण महिला रुग्णांचे आहे. मुंबई पालिकेच्या आकडेवारीनुसार, १७ सप्टेंबरपर्यंत १ हजार २६५ रुग्ण गंभीर असून आयसीयूमध्ये १ हजार ५८३ रुग्ण आहेत. त्याचवेळी आॅक्सिजनवर ५ हजार ९१९ रुग्ण असून व्हेंटिलेटरवर १ हजार ५ रुग्ण आहेत. आॅक्सिजन-व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा आकडा वाढल्याने साहजिकच आॅक्सिजनची मागणीही मुंबईत काही प्रमाणात वाढली आहे. संपूर्ण मुंबईत एक लाख लीटरपेक्षा अधिक आॅक्सिजन लागत आहे, यात सरकारी, पालिका, खासगी रुग्णालये आणि कोविड सेंटरचा समावेश आहे.पालिका रुग्णालये-कोविड केंद्रांचा विचार केल्यास पालिकेकडे अडीच लाख लीटर इतका आॅक्सिजनचा साठा उपलब्ध असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. वरळी, बीकेसी,  नेस्को-गोरेगाव, दहिसर (दोन सेंटर), मुलुंड आणि अन्य एका ठिकाणीअशी सात कोविड केंद्रे कार्यरत आहेत.

सर्व केंद्रांना आॅक्सिजनचा तुटवडा होऊ नये यासाठी दूरदृष्टीने सातही सेंटरमध्ये टर्बो अर्थात आॅक्सिजनच्या मोठ्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. १३ हजार आणि २६ हजार लीटरच्या या टाक्या असून काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन टाक्या बसवल्या आहेत. रुग्णालयातही टाक्या आणि सिलिंडरची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेकडे आता अडीच लाख लीटरचा साठा उपलब्ध असून यातील २० टक्केच आॅक्सिजन लागत आहे. त्यामुळे ८० टक्के साठा शिल्लक राहत असल्याचेही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.रायगडमध्ये ५५४ नवे कोरोना रुग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात शनिवारी २० सप्टेंबर रोजी ५५४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार ५३२ वर पोचली आहे. दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे, आतापर्यंत एकूण ११०४ जणांना मृत्यूने कवटाळले आहे तर, ३४ हजार ६१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.शनिवारी दिवसभरात पनवेल महापालिका क्षेत्रात २१२, पनवेल ग्रामीणमध्ये ४६, उरण २३, खालापूर ३६, कर्जत २५, पेण ४३, अलिबाग ६९, मुरुड ३, माणगाव २९, रोहा ३६, सुधागड २, श्रीवर्धन २, म्हसळा ७, महाड १४, पोलादपूर ७ असे एकूण ५५४ रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १९२, पनवेल ग्रामीण ६०, उरण ७, खालापूर ३५, कर्जत २७, पेण ५६, अलिबाग १००, मुुरुड २३, माणगाव ३६, रोहा ६३, सुधागड १, म्हसळा ४, महाड २८, पोलादपूर ५ असे एकूण ६३७ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस