शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Maharashtra CM News: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीबद्दल शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 16:34 IST

Maharashtra News: उद्धव ठाकरे हे राज्याचा कारभार चांगल्याप्रकारे सांभाळतील असा विश्वास शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला असून महाविकास आघीडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त सुद्धा ठरला असून 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.40 वाजता दादर येथील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. तर उद्धव ठाकरे हे राज्याचा कारभार चांगल्याप्रकारे सांभाळतील असा विश्वास शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखातीत बोलताना जोशी म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने याचे आनंद आहे. उद्धव ठाकरे हे कधीच कोणत्याही खुर्चीच्या मागे पळाले नाही. मात्र राज्यातील परिस्थिती आणि राजकरण पाहता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावेत असे सर्वांना वाटत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला असून, याचे मला फार समाधान असल्याचे मनोहर जोशी म्हणाले.

तसेच राज्याचे व पक्षाचे काम पाहणे यात खूप फरक आहे. पण उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने पक्षाचे काम पहिले व शिवसेना पुढे नेली. त्याच पद्धतीने ते नवीन प्रथा अमलात आणतील व एक यशस्वी मुख्यमंत्री होतील अशी मला अपेक्षा असल्याचे जोशी म्हणाले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, तो अतिशय उत्तम निर्णय असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.

तसेच माझा शपथविधी सोहळा सुद्धा शिवाजीपार्कवर झाला होता. मात्र त्यावेळी भाजप-शिवसेना युती होती. ती शपथविधी मला आजही आठवतो असेही मनोहर जोशी म्हणाले. तसेच जो व्यक्ती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतो त्याला खूप काम करावे लागते आणि उद्धव ठाकरे हे ते करतील यावर माझा विश्वास आहे. तसेच त्यांना उत्तम यश मिळावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर हे सरकार फक्त पाच नाही तर त्यापुढे ही जाऊन काम करेल अशी मला अपेक्षा असल्याचे सुद्धा मनोहर जोशी यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण