शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
3
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
4
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
5
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
6
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
7
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
8
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
9
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
10
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
11
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
12
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
13
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
14
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
15
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
20
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या उमेदवारांची आज पहिली यादी होणार जाहीर?; उत्तर महाराष्ट्रात आघाडीला तगडे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 08:44 IST

महाराष्ट्रातली सत्ताधारी भाजपा रविवारी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

मुंबईः महाराष्ट्रातली सत्ताधारी भाजपा रविवारी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील भाजपा नेते मोदींशी चर्चा केल्यानंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रात्री अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राचा यशस्वी दौरा करून भारतात परतले आहेत. संभाव्य यादीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील सकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. निवडणूक आयोगानं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 ऑक्टोबर ही अंतिम तारीख दिली आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपानं वाढवल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणीविधानसभा निवडणुकीत भाजपाची नजर उत्तर महाराष्ट्रातील 47 जागांवर आहे. ज्याला कधी काळी काँग्रेसचा गड समजला जात होता. उत्तर महाराष्ट्रातल्या अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात काँग्रेस कमजोर झाली आहे. तर दुसरीकडे भाजपा इथे ताकद वाढवण्यात यशस्वी ठरली आहे. भाजपाला या जिल्ह्यांत प्रसार करण्यात कोणतीही कमी ठेवायची नाहीये. उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे दोन्ही विरोधी पक्षांची अडचण वाढलेली आहे. आदिवासीबहुल नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पारंपरिक स्वरूपात काँग्रेस-राष्ट्रवादी मजबूत आहे.भाजपानं राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विजय कुमार गावित यांची मुलगी हिना गावितला पक्षात सामावून घेतल्यानंतर आघाडीच्या या गडाला पहिल्यांदा खिंडार पडला. आता काँग्रेसचे दिग्गज नेते अमरिश पटेलही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तसेच भाजपाची उमेदवारी यादी जाहीर होण्यापूर्वीही काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. नाशिकमध्ये काँग्रेसजवळ दोन आमदार होते. ज्यातील निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर अहमदनगरचे अकोलेतील राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील या दोघांनीही भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपा चांगली कामगिरी करेल, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.   उत्तर महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांत 47 जागाउत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत 288 विधानसभा जागांपैकी 47 जागा आहेत. ज्यात नंदुरबारमध्ये चार विधानसभा मतदारसंघ, धुळ्यात पाच विधानसभा मतदारसंघ, जळगावात 11 विधानसभा मतदारसंघ, नाशिकमध्ये 15 विधानसभा मतदारसं, तर अहमदनगरमध्ये 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा