शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डीएमआयसीअंतर्गत पहिली गुंतवणूक औरंगाबादेत- संजय सेठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 20:11 IST

आॅटो क्षेत्रात महागड्या बाइक्सची निर्मिती करणा-या ‘ह्युसंग’ कंपनीची राज्याला भेट मिळाली आहे. डीएमआयसीअंतर्गत देशातील पहिली गुंतवणूक यानिमित्ताने औरंगाबादेत येत असल्याचे एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत अनौपचारिक चर्चेदरम्यान सांगितले.

ठळक मुद्देआॅटो क्षेत्रात महागड्या बाइक्सची निर्मिती करणा-या ‘ह्युसंग’ कंपनीची राज्याला भेट मिळाली आहे. डीएमआयसीअंतर्गत देशातील पहिली गुंतवणूक यानिमित्ताने औरंगाबादेत येत असल्याचे एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत अनौपचारिक चर्चेदरम्यान सांगितले.ह्युसंग हा विविध उत्पादनांची निर्मिती करणारा कोरियातील मोठा समूह आहे. कंपनी औरंगाबादेतील शेंद्रा एमआयडीसीत ‘स्पान्डेक्स’ हे सुटे भाग तयार करणार आहे. हे मुळात रबराचे सुटे भाग असतात. त्यांचा उपयोग अनेक ठिकाणी होतो.

मुंबई : आॅटो क्षेत्रात महागड्या बाइक्सची निर्मिती करणा-या ‘ह्युसंग’ कंपनीची राज्याला भेट मिळाली आहे. डीएमआयसीअंतर्गत देशातील पहिली गुंतवणूक यानिमित्ताने औरंगाबादेत येत असल्याचे एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत अनौपचारिक चर्चेदरम्यान सांगितले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्वर्जन्स’ या गुंतवणूक परिषदेच्या पार्श्वभूमीवर सेठी यांनी ‘लोकमत’च्या वरळी येथील कॉर्पोरेट कार्यालयाला भेट दिली.ह्युसंग हा विविध उत्पादनांची निर्मिती करणारा कोरियातील मोठा समूह आहे. कंपनी औरंगाबादेतील शेंद्रा एमआयडीसीत ‘स्पान्डेक्स’ हे सुटे भाग तयार करणार आहे. हे मुळात रबराचे सुटे भाग असतात. त्यांचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. मात्र प्रामुख्याने आॅटोमोबाइलमध्ये उष्णतारोधक म्हणून हा भाग वापरला जातो. त्याची निर्मिती कंपनी शेंद्रा एमआयडीसीत करणार आहे. मुख्य म्हणजे, ही गुंतवणूक दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरचा (डीएमआयसी) भाग असून या कॉरिडॉरमधील ही देशातील पहिली गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीसाठी कंपनीने पाच टक्के रक्कमही जमा केली आहे, असे सेठी यांनी सांगितले.हे तर ‘मेक विथ महाराष्ट्र’‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हा मेक इन इंडियाचाच एक भाग आहे. यामध्ये काही लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार होणार आहेत. मात्र या करारापेक्षाही यानिमित्ताने तयार होणारे वातावरण महाराष्ट्राला जागतिक पातळीवर नेण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्राने विविध धोरणे आणली आहेत. या धोरणांच्या निमित्ताने येथे असलेली औद्योगिक वातावरण जागतिक दर्जाच्या कंपन्यांसमोर सादर करता येणार आहेत. याचा फायदा येत्या काळात होईल. त्यातून एकप्रकारे ‘मेक विथ महाराष्ट्र’ संकल्पना उभी होईल, असे ते म्हणाले.औद्योगिक धोरणाची सुरुवात विलंबानेराज्य सरकारने २०१३ च्याच औद्योगिक धोरणाला मुदतवाढ दिली. त्याऐवजी आधीच जीएसटीला अनुसरून नवीन धोरण का तयार केले नाही? याबाबत सेठी यांनी मुळात जुन्या धोरणाची सुरूवात विलंबाने झाल्याचे मत मांडले. जुने धोरण २०१३ चे असले तरी त्याची अंमलबजावणी या सरकारने २०१४ मध्ये केली. त्यामुळे त्यादृष्टीने या धोरणासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसीत भूखंडांची प्रतिक्षा यादी मोठी असल्याबद्दल त्यांनी सांगितले की, यासाठीच आता भूखंड वाटपाची प्रणाली बदलण्यात आली आहे. लिलावाद्वारे उद्योगांना जमीन दिली जाते. कमी उद्योग असलेल्या वसहतीत जमीन उपलब्ध आहेच.प्रसारमाध्यमांच्या चर्चेत ‘लोकमत’‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. त्यामध्येच २० फेब्रुवारीला दुपारी अडीच वाजता प्रसारमाध्यमांसंबंधी ‘माहिती व मनोरंजनाचे भविष्य’ या विषयावर चर्चासत्र होत आहे. ‘लोकमत’चे संपादकीय संचालक व सह व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा त्यामध्ये वक्ते असतील, असे सेठी यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Mumbaiमुंबई