शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दप्तर भरा, शाळेत चला; पहिली ते चौथीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होणार; सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 06:38 IST

शाळा सुरू करण्याच्या निर्णयाची माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करताना सर्व प्रकारची काळजी घेण्यात येईल. तसेच पालकांच्या परवानगीनेच या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल.

मुंबई : कोरोनामुळे साधारणत: दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळांतील किलबिलाट पुन्हा सुरू होणार आहे. १ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथीचे वर्ग आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा नियमित सुरू होतील.शाळा सुरू करण्याच्या निर्णयाची माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करताना सर्व प्रकारची काळजी घेण्यात येईल. तसेच पालकांच्या परवानगीनेच या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल. शाळेच येण्याचे बंधन विद्यार्थ्यांवर नसेल. इयत्ता पाचवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला. त्यानुसार ग्रामीण भागात ५वी ते १२वी तर शहरी भागात ८वी ते १२वीच्या शाळा-महाविद्यालये सुरू झाली. त्यानंतर ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा विचार सुरू होता. यासाठी आरोग्य विभाग, मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता. बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सशी चर्चाही केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या...- मुलांचे कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली जाईल.- मुलांना एकत्र बसून शिक्षण घेण्याची आवश्यकता तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यानुसार चर्चा करून निर्णय घेतला. पालक आणि शिक्षकांशीही चर्चा करण्यात आली.- मुलांना सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण वातावरण मिळेल, याची काळजी घेतली जाईल. शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी पुढील सहा दिवस विशेष प्रयत्न केले जातील.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र