शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाचवीचा वर्ग जोडणार प्राथमिक शाळेला, शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 04:42 IST

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी १३ जुलैला शिक्षण खात्याच्या अपर मुख्य सचिवांना हा प्रस्ताव दिला. विशेष म्हणजे तब्बल दीड महिन्यानंतर हा अहवाल आयुक्त कार्यालयातून फुटला आणि शिक्षक संघटना जाग्या झाल्या. न

- अविनाश साबापुरेयवतमाळ : सर्व शाळांमधील शिक्षकांची पदे निश्चित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी जुलैमध्ये शासनाला सादर केलेला प्रस्ताव आॅगस्टमध्ये फुटला असून या प्रस्तावाने शिक्षकांची झोप उडविली आहे. प्रस्तावातील सुधारित निकषामुळे उच्च प्राथमिक स्तरावर अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे.शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी १३ जुलैला शिक्षण खात्याच्या अपर मुख्य सचिवांना हा प्रस्ताव दिला. विशेष म्हणजे तब्बल दीड महिन्यानंतर हा अहवाल आयुक्त कार्यालयातून फुटला आणि शिक्षक संघटना जाग्या झाल्या. नव्या प्रस्तावानुसार प्रति विद्यार्थी शिक्षक पदे मंजूर करताना विद्यार्थी संख्या वाढणार आहे. आतापर्यंत जेथे ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक पद मंजूर होते, तेथे ३५ विद्यार्थ्यांची गरज भासणार आहे.पद निश्चितीचा असा आहे प्रस्तावपाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या माध्यमिक शाळेत १७५ विद्यार्थी संख्येपर्यंत पाच पदे मिळतील. १७५ च्या पुढे प्रति ३५ विद्यार्थ्यांमागे एक अशी शिक्षक पदे अनुज्ञेय ठरतील. आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळांना १०५ विद्यार्थ्यांपर्यंत तीन पदे आणि त्यापुढे प्रति ४० विद्यार्थ्यांमागे एक या प्रमाणात शिक्षक मिळतील.पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्राथमिक शाळेत मात्र ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हा निकष कायम असेल. मात्र दोनशे पटसंख्येशिवाय मुख्याध्यापक पद मिळणार नाही. दोनशेच्या पुढे प्रत्येक ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक मंजूर होईल. सहावी ते आठवी वर्ग असलेल्यांना ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक मंजूर केला जाईल.शारीरिक शिक्षण शिक्षकांना आनंद : २०१४-१५ च्या संचमान्यतेतून शारीरिक शिक्षकांना वगळले होते. त्या पुढच्या वर्षी त्यांचा विशेष शिक्षक दर्जा काढून घेतला. मात्र आता आयुक्तांच्या नव्या प्रस्तावानुसार शारीरिक शिक्षण शिक्षकांना संचमान्यतेत स्थान मिळणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थी