शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

बिकट स्थितीमुळं शेतकरी पुत्रांची लग्न होईना; नवनीत राणांनी लोकसभेत मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 11:04 AM

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील ३३ वर्षांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोण पसरल्याचे ननवीत राणा यांनी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक शेतकरी आत्महत्येवर गाजणार असच दिसत आहे. राज्यातील नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत शेतकरी समस्यांना वाचा फोडली.

नवनीत राणा म्हणाल्या की, शहरांना बाजुला ठेवून ग्रामीण महाराष्ट्रावर आपण चर्चा करूया. एकेकाळी महाराष्ट्राची ओळख वेगळी होती. परंतु, आता महाराष्ट्र राज्य शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. देशात मागील ४० वर्षांत साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत. यापैकी ८० हजार शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रातील आहेत. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील ३३ वर्षांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोण पसरल्याचे ननवीत राणा यांनी लोकसभेत सांगितले.

यंदाही राज्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाची योग्य किंमत मिळत नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून डायरेक्ट खरेदी करावी, यासाठी आपण आदेश द्यावेत, अशी मागणी राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. शेतकऱ्यांच्या मुलांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या समस्या निर्माण होत आहे. शेतकरी म्हटलं की, स्थळ येत नाहीत. शेतकऱ्याच्या घरी आपल्या मुलीला दोन वेळचं जेवन मिळणार नाही, असा विचार मुलींकडचे करत आहेत. ही परिस्थिती भीषण असल्याचे नवनीत राणा यांनी नमूद केले.