शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हवं जगण्याचं बळ; सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात, धक्कादायक वास्तव आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:32 IST

देशभरात २०२३ मध्ये १०,७८६ आत्महत्या शेतीशी संबंधित; ३ वर्षांत शेतकरी आत्महत्यांमध्ये केवळ ०.३ टक्क्यांनी घट, प्रभावी उपाययाेजनांची आवश्यकता

मुंबई : बेभरवशाची शेती आणि त्यातून डोईवर वाढणारे कर्ज या विळख्यातून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे भयावह वास्तव केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून  पुन्हा एकदा समोर आले आहे. २०२३ मध्ये देशातील सरासरी प्रत्येक २ पैकी १ शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाली आहे. देशभरात २०२३ मध्ये एकूण १०,७८६ शेतीशी संबंधित आत्महत्या झाल्या असून ४,६९० आत्महत्या शेतकरी, तर ६,०९६ आत्महत्या शेतमजुरांनी केल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ६,६६९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली असून, ४,१५० शेतकरी आणि २,५१९ शेतमजूर यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

देशात २०२३ मध्ये एकूण १,७१,४१८ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण ६.३ टक्के आहे. या ४,६९० शेतकरी/शेतमजुरांच्या आत्महत्यांपैकी ४,५५३ पुरुष आणि १३७ महिला आहेत. २०२१ मध्ये १०,८८१, तर २०२२ मध्ये ११,२९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०२१ मध्ये एकूण आत्महत्यांच्या तुलनेत हे प्रमाण ६.६ टक्के, तर २०२२ मध्येही ६.६ टक्के इतकेच राहिले आहे. याचाच अर्थ गेल्या ३ वर्षांत शेतकरी आत्महत्यांमध्ये केवळ ०.३ टक्क्यांनी घट झाली आहे. 

महिला शेतकऱ्यांनीही संपविले जीवन भारतात शेतकरी आत्महत्यांत ९७% पुरुष, ३% महिला आहेत. महाराष्ट्रातही हेच प्रमाण दिसते. अहवालानुसार, महाराष्ट्रात २०२३ मध्ये ३,९०१ पुरुष तर २५० महिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २,४४१ पुरुष आणि ७७ महिला शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये महिलांचे प्रमाण ५ टक्क्यांच्या आसपास आहे.  

देशात सर्वाधिक आत्महत्या कुणाच्या? रोजंदारी कामगार     २७.५% गृहिणी     १४.०% स्वयंरोजगार     ११.८% पगारी कर्मचारी     ९.६% बेरोजगार     ८.३% विद्यार्थी     ८.१% शेती क्षेत्र     ६.३% निवृत्त व्यक्ती     ०.६% इतर     १३.७% 

कोणत्या राज्यांत शेतकरी आत्महत्या नाहीत? : पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल, गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप.

देशभरात आत्महत्या का केल्या जात आहेत? कौटुंबिक समस्या     ३१.९% आजारपण     १९.०% व्यसन/दारूचे व्यसन     ७.०% विवाहाशी संबंधित समस्या     ५.३% प्रेमसंबंध     ४.७% दिवाळखोरी/कर्जबाजारीपणा     ३.८% बेरोजगारी     १.८% परीक्षेत अपयश     १.४% नातेवाइकांचा मृत्यू     १.३% व्यावसायिक/करिअर समस्या     १.१% मालमत्तेचा वाद     १.०% गरिबी     ०.७% सामाजिक प्रतिष्ठा गमावणे     ०.५% अवैध संबंध     ०.४% वंध्यत्व/अपत्य न होणे     ०.३% कारण माहीत नाही     १०.०% इतर कारणे     ९.८%

व्यावसायिकांच्या आत्महत्या सर्वाधिक कुठे?महाराष्ट्र     १६%कर्नाटक     १४.१%तामिळनाडू     ८.९%प. बंगाल     ८%मध्य प्रदेश     ६.८%

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers Need Strength to Live; Maharashtra Has Highest Suicides

Web Summary : Maharashtra leads in farmer suicides, with nearly half of India's cases occurring there in 2023. NCRB data reveals 6,669 farmer suicides in Maharashtra, including 4,150 farmers and 2,519 farm laborers. Family problems, illness, and addiction are major contributing factors to suicides nationwide.
टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूMaharashtraमहाराष्ट्र