शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सेलिब्रिटी 'माया' बेपत्ता! ताडोबातील प्रसिद्ध वाघिण गायब?; वनविभागाकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 10:04 IST

वाघांचे जीवन फार कठीण असते. वाघ १०-१५ वर्षापर्यंत जिवंत राहतो. ताडोबात वाघांची घनता आणि क्षेत्र आहे त्यात वाघांना संघर्ष करावा लागतो.

चंद्रपूर – ताडोबा व्याघ्रप्रकल्पातून पर्यटकांसाठी आकर्षण असलेली प्रसिद्ध माया वाघिण गेल्या काही दिवसांपासून गायब झाल्याची चर्चा आहे. माया वाघिण तिचं परिक्षेत्र सोडून दुसरीकडे स्थलांतरीत झालीय का याचा शोध आता वनविभागाकडून घेतला जात आहे. १ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी पुन्हा व्याघ्रप्रकल्प पर्यटनासाठी सुरू झाला आहे. त्यानंतर आज हा प्रकार समोर आला आहे.

याबाबत ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र निदेशक जितेंद्र रामगावकर म्हणाले की, ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत बंद होता. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांचीही पाहणी कमी झाली होती. आता १ ऑक्टोबरला पर्यटनाला सुरुवात झाली आहे. सुरुवात होताच आपल्याला ठराविक वाघ किंवा वाघिण दृष्टीस पडेल अशी अपेक्षा करणे मूळात चुकीचे आहे. व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार जवळपास १७०० स्क्वेअर किमी आहे. त्यात १०० पेक्षा जास्त वाघांचे अस्तित्व आहे. त्यामुळे एखाद्या वाघ निदर्शनास न पडणे त्यावरून हा गायब झालाय, काहीतरी शंका व्यक्त करणे घाईचे ठरेल. काही दिवस आमची मॉनेटरिंग सिस्टमला वेळ द्यावा, आमची यंत्रणा काम करतेय. परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. त्यात वाघिणीला जर पिल्ले झाली असतील. किंवा एखाद्या घटनेमुळे फॅक्टरमुळे वाघिण तिचं परिक्षेत्र सोडून गेलीय का हेदेखील पाहणे गरजेचे आहे. कमीत कमी २५-३० दिवस सिस्टमॅटिक ट्रेसिंग ठेवल्यानंतर काहीतरी कळेल. तोपर्यंत कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य राहणार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच वाघांचे जीवन फार कठीण असते. वाघ १०-१५ वर्षापर्यंत जिवंत राहतो. ताडोबात वाघांची घनता आणि क्षेत्र आहे त्यात वाघांना संघर्ष करावा लागतो. कारण नवनवीन वाघ येत असतात. वाघांच्या लढाई होतात. नवीन ठिकाणी वाघांना पाठवले जाऊ शकते. वाघिणींना पिल्ले होऊ शकतात. म्हणून वेगळी रणनीती वाघिण अवलंबते, त्यामुळे अनेक फॅक्टर्स यामागे असू शकतात. त्यामुळे आमची सिस्टमॅटिक यंत्रणा जेव्हा काही तरी समोर घेऊन येईल तेव्हा ती माहिती सगळ्यांसमोर ठेवली जाईल असंही जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

दरम्यान, माया वाघिणीचे वय १३ वर्ष आहे. जंगलात एखादा वाघ १२ ते १५ वर्ष जगू शकतो. त्यात कदाचित नैसर्गिक मृत्यूही वाघिणीचा झाला असा संशय व्यक्त करण्यात येतोय. परंतु सगळ्या गोष्टींची पडताळणी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वन अधिकाऱ्यांकडून तपासून घेतली जात आहे. लवकरच माया वाघिण पर्यटकांच्या दृष्टीस पडेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पTigerवाघ