शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रिटी 'माया' बेपत्ता! ताडोबातील प्रसिद्ध वाघिण गायब?; वनविभागाकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 10:04 IST

वाघांचे जीवन फार कठीण असते. वाघ १०-१५ वर्षापर्यंत जिवंत राहतो. ताडोबात वाघांची घनता आणि क्षेत्र आहे त्यात वाघांना संघर्ष करावा लागतो.

चंद्रपूर – ताडोबा व्याघ्रप्रकल्पातून पर्यटकांसाठी आकर्षण असलेली प्रसिद्ध माया वाघिण गेल्या काही दिवसांपासून गायब झाल्याची चर्चा आहे. माया वाघिण तिचं परिक्षेत्र सोडून दुसरीकडे स्थलांतरीत झालीय का याचा शोध आता वनविभागाकडून घेतला जात आहे. १ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी पुन्हा व्याघ्रप्रकल्प पर्यटनासाठी सुरू झाला आहे. त्यानंतर आज हा प्रकार समोर आला आहे.

याबाबत ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र निदेशक जितेंद्र रामगावकर म्हणाले की, ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत बंद होता. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांचीही पाहणी कमी झाली होती. आता १ ऑक्टोबरला पर्यटनाला सुरुवात झाली आहे. सुरुवात होताच आपल्याला ठराविक वाघ किंवा वाघिण दृष्टीस पडेल अशी अपेक्षा करणे मूळात चुकीचे आहे. व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार जवळपास १७०० स्क्वेअर किमी आहे. त्यात १०० पेक्षा जास्त वाघांचे अस्तित्व आहे. त्यामुळे एखाद्या वाघ निदर्शनास न पडणे त्यावरून हा गायब झालाय, काहीतरी शंका व्यक्त करणे घाईचे ठरेल. काही दिवस आमची मॉनेटरिंग सिस्टमला वेळ द्यावा, आमची यंत्रणा काम करतेय. परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. त्यात वाघिणीला जर पिल्ले झाली असतील. किंवा एखाद्या घटनेमुळे फॅक्टरमुळे वाघिण तिचं परिक्षेत्र सोडून गेलीय का हेदेखील पाहणे गरजेचे आहे. कमीत कमी २५-३० दिवस सिस्टमॅटिक ट्रेसिंग ठेवल्यानंतर काहीतरी कळेल. तोपर्यंत कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य राहणार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच वाघांचे जीवन फार कठीण असते. वाघ १०-१५ वर्षापर्यंत जिवंत राहतो. ताडोबात वाघांची घनता आणि क्षेत्र आहे त्यात वाघांना संघर्ष करावा लागतो. कारण नवनवीन वाघ येत असतात. वाघांच्या लढाई होतात. नवीन ठिकाणी वाघांना पाठवले जाऊ शकते. वाघिणींना पिल्ले होऊ शकतात. म्हणून वेगळी रणनीती वाघिण अवलंबते, त्यामुळे अनेक फॅक्टर्स यामागे असू शकतात. त्यामुळे आमची सिस्टमॅटिक यंत्रणा जेव्हा काही तरी समोर घेऊन येईल तेव्हा ती माहिती सगळ्यांसमोर ठेवली जाईल असंही जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

दरम्यान, माया वाघिणीचे वय १३ वर्ष आहे. जंगलात एखादा वाघ १२ ते १५ वर्ष जगू शकतो. त्यात कदाचित नैसर्गिक मृत्यूही वाघिणीचा झाला असा संशय व्यक्त करण्यात येतोय. परंतु सगळ्या गोष्टींची पडताळणी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वन अधिकाऱ्यांकडून तपासून घेतली जात आहे. लवकरच माया वाघिण पर्यटकांच्या दृष्टीस पडेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पTigerवाघ