शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

वाशीमच्या कुटुंबाची पाण्यासाठी धडपड! लॉकडाऊन काळात २२ दिवसांत घरातच खणली २० फूट खोल विहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 17:11 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त वाशीम जिल्ह्यातील एका कुटुंबानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त वाशीम जिल्ह्यातील एका कुटुंबानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. गावची पाण्याची समस्य दूर व्हावी यासाठी लॉकडाऊन काळात राहत्या घरातच कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून अवघ्या २२ दिवसांत २० फूट खोल विहीर खणली आहे. इतकंच नव्हे, तर आणखी पाणी मिळावं आणि गावाची तहान भागावी यासाठी आणखी खोल खोदकाम करण्याचा कुटुंबाचा मानस आहे. 

वाशीमच्या जामखेड गावातील रामदास पोफळे यांनी लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर जाणं टाळायचं होतं यासाठी कुटुंबीयांना सोबत घेऊन घरातच विहीर खणण्याचं ठरवलं. त्यानुसार रामदास पोफळे स्वत:, त्यांची पत्नी आणि १२ वर्षीय मुलाला सोबत घेऊन त्यांनी काम सुरू केलं. २२ दिवसांत तिघांनी मिळून २० फूट खोल विहीर खणली. 

"गावात पाण्याची खूप मारामार आहे. लॉकडाऊनमध्ये तसंही हाताशी काही काम नव्हतं. त्यामुळे घरातच विहीर खणण्याचा मानस मी कुटुंबीयांसमोर व्यक्त केला. त्याला त्यांनीही होकार दिला. २२ दिवस आमचं विहीर खणण्याचं काम सुरू होतं. २० फूट खोल खणल्यानंतर आम्हाला पाणी लागलं. पण इतक्या पाण्यात केवळ माझ्या कुटुंबाचीच पाण्याची गरज पूर्ण होईल. त्यामुळे आणखी ५ ते १० फूट खोल खणण्याचा विचार आम्ही केला आहे की जेणेकरुन परिसरातील इतरांनाही पाणी मिळेल", असं रामदास पोफळे यांनी सांगितलं.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwashimवाशिमMaharashtraमहाराष्ट्र