शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जवखेडा हत्यांमागे कौटुंबिक वाद

By admin | Updated: December 5, 2014 15:01 IST

जवखेडे खालसा येथे झालेली तिघांची हत्या ही कौटुंबिक कारणातून झाली आहे. रागाच्या भरात आरोपीने हे दुष्कृत्य केले

अहमदनगर : जवखेडे खालसा येथे झालेली तिघांची हत्या ही कौटुंबिक कारणातून झाली आहे. रागाच्या भरात आरोपीने हे दुष्कृत्य केले असून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनेच मृतदेहाचे तुकडे करून ते विहिरीत, बोअरवेलमध्ये टाकण्यात आले. या प्रकरणात अटक झालेला प्रशांत जाधव याचा हत्याकांडात सहभाग स्पष्ट झाला आहे. तसे पुरावे मिळाल्यामुळेच त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, तो प्रमुख आरोपी आहे की सूत्रधार? हे मात्र पोलिसांनी स्पष्ट करण्यास नकार दिला.तब्बल ४३ दिवसांनंतर जवखेडे हत्याकांडाच्या तपासाला गती मिळाली आहे. सहा संशयितांच्या वैज्ञानिक चाचण्या झाल्या. त्यामध्ये एका महिलेने दिलेल्या जबाबात प्रशांत जाधव याचे नाव पुढे आले. त्यानंतर प्रशांतवर आधी वैज्ञानिक चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या चाचण्या पॉझिटिव्ह मिळाल्या. त्यानुसार त्याची नार्को चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. या अहवालात प्रशांतचा हत्याकांडात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले, असे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.दरम्यान, पोलिसांनी बुधवारी दुपारी प्रशांत जाधव याच्या घरामधून रक्ताचे डाग असलेले कपडे, काही शस्त्रे जप्त केली. त्यानंतर जाधव यांच्या नातेवाईकांमध्ये वेगवान हालचाली घडल्या. या हालचालींवर पोलिसांनी नजर ठेवली. याच दरम्यान त्यांना काही पुरावे मिळाले. त्याच आधारे त्यांनी प्रशांत जाधव याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्यामध्ये त्याने हत्याकांडात सहभाग असल्याची कबुली दिल्यानेच त्याला आरोपी करण्यात आले आहे. यावेळी पोलिसांना एक साक्षीदारही मिळाला. त्याच्या हालचालीवर इतरांनी ठेवलेली नजर, त्यांच्यामध्ये झालेले संभाषण हेच पुरावा म्हणून पोलिसांना मिळाले आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्रशांत याला अटक करताच आणखी काहीजण फरार झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)