शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सेंद्रीय शेती उत्पादनांचा बाजारात सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 11:55 IST

राज्यात सध्या एकूण शेतीपैकी ७ लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाते़. ..

ठळक मुद्देसेंद्रिय उत्पादनांच्या विश्वासार्हतेकरिता शासनस्तरावर हालचालीबनावट सेंद्रिय शेती उत्पादनांना आळा घालण्याकरिता कायदा लवकरच  सेंद्रिय शेतीत महाराष्ट्र आघाडीवर पण प्रमाणिकराअभावी आंतरराष्ट्रीय बाजार कमी 

- नीलेश राऊत पुणे : सेंद्रिय शेतीचे महत्व व या सेंद्रिय उत्पादनांची लोकप्रियता लक्षात घेता, शासनस्तरावरून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे़. यातून सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसारही होत आहे़. परंतू दुसरीकडे बाजारात बनावट सेंद्रिय शेती उत्पादनांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे़. केवळ ‘सेंद्रिय उत्पादन लेबल’ लावून, आहे तोच माल चढ्या किंमतीने विकून ग्राहकांची राजरोसपणे फसवणुक सुरू असल्याने सेंद्रिय शेती उत्पादनांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे़. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या एकूण शेतीपैकी ७ लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाते़. यामध्ये परंपरागत रसायनांचा वापर न करणारे डोंगराळ व आदिवासी क्षेत्र यांचाही समावेश आहे़. यापैकी ३ लाख ३८ हजार ११७ हेक्टर क्षेत्रावर राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रीय शेती (पंरपरागत कृषी विकास योजना) विकास योजनेंतर्गत उत्पादन घेणे सुरू आहे़. या सेंद्रीय उत्पादनांना सहभाग हमी पध्दतीने (पीजीएस) प्रमाणिकरण केले जात आहे़. परंतू हे प्रमाणिकरण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्राह्य धरले जात नाही़. तरअपेडामार्फत मान्यताप्राप्त खाजगी प्रमाणिकरण संस्थांकडून झालेले सेंद्रिय शेती उत्पादनाचे प्रमाणिकरण अधिक विश्वासार्ह असून, या प्रमाणिकरणास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मान्यताही आहे़. यामुळे पीजीएसला अधिक सक्षम करणे जरूरी आहे़. दरम्यान राज्य शासनानेही याची दखल घेऊन आता सेंद्रिय शेतीला राज्य शासनाची मोहोर उमटवून अधिक विश्वासार्ह बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़. याकरिता पीजीएस व्यतिरिक्त व अधिक विश्वासार्ह प्रमाणिकरणाकरिता महाराष्ट्र शासनाने सिक्कीम राज्याच्या धर्तीवर सेंद्रिय शेती उत्पादन प्रमाणिकरण यंत्रणा उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत़. -----भारतातून सुमारे साडेतीन हजार कोटी रूपयांची निर्यात अपेडाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताने सन २०१८ मध्ये प्रमाणित सेंद्रिय उत्पादनांचे अंदाजे १़७० दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन केले आहे़. यामध्ये प्रामुख्याने तेल बियाणे, ऊस, तृणधान्ये, कापूस, कडधान्ये, औषधी वनस्पती, चहा, फळे, मसाले, सुकामेवा, भाजीपाला या सर्व प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे. यामध्ये नियार्तीचे एकूण प्रमाण ८.८८ लाख मेट्रिंक टन होते़ या सेंद्रिय अन्न नियार्तीचे मूल्य हे ३४,३़४८ कोटी रूपये (५१५़४४ दशलक्ष डॉलर्स) इतके आहे़. ही सेंद्रिय उत्पादने अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंड, आॅस्ट्रेलिया, इस्राईल, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, न्यूझीलंड, जपान इत्यादी देशांत निर्यात केली गेली़. --- 

* सेंद्रिय शेतीत महाराष्ट्र आघाडीवर पण प्रमाणिकराअभावी आंतरराष्ट्रीय बाजार कमी देशामध्ये सिक्कीम राज्य हे संपूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे राज्य असले तरी, सेंद्रीय शेती क्षेत्राची तुलना करता महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे़ मात्र तरीही महाराष्ट्रात पाहिजे तसा सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार झालेला नाही़ किंबहुना या उत्पादनांना मिळणारी पीजीएस प्रमाणिकरण इतर प्रमाणिकराच्या तुलनेत खूपच कमी पडत आहे़ देशात महाराष्ट्रखालोखाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांच्यानंतर मध्य प्रदेश हे सर्वात मोठे सेंद्रिय उत्पादक राज्य आहे. वस्तूंच्या बाबतीत तेल बियाणे ही सर्वात मोठी श्रेणी असून त्यानंतर ऊस, तृणधान्ये, कडधान्ये, औषधी, हर्बल आणि सुगंधी वनस्पती आणि मसाले यांचा समावेश आहे़ ------------* बनावट सेंद्रिय शेती उत्पादनांना आळा घालण्याकरिता कायदा लवकरच बाजारातील बनावट सेंद्रिय शेती उत्पादनांना आळा घालण्याकरिता शासन गांभिर्याने कार्यवाही करीत असून, या फसवेगिरीला आळा बसविण्याकरिता शासन सेंद्रिय शेतीकरिताचा स्वतंत्र कायदा अंमलात आणणार आहे़ यामुळे शासनाची स्वत:ची नियमावली अस्थित्वात येणार आहे़ तसेच सेंद्रिय शेती विषयक ग्राहकांमध्ये जागृत करून, दर्जेदार व विश्वासार्ह सेंद्रिय शेती उत्पादनांचा पुरवठा करणे यासाठी शासन प्रयत्नशील आहे़  

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजारGovernmentसरकार