शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सेंद्रीय शेती उत्पादनांचा बाजारात सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 11:55 IST

राज्यात सध्या एकूण शेतीपैकी ७ लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाते़. ..

ठळक मुद्देसेंद्रिय उत्पादनांच्या विश्वासार्हतेकरिता शासनस्तरावर हालचालीबनावट सेंद्रिय शेती उत्पादनांना आळा घालण्याकरिता कायदा लवकरच  सेंद्रिय शेतीत महाराष्ट्र आघाडीवर पण प्रमाणिकराअभावी आंतरराष्ट्रीय बाजार कमी 

- नीलेश राऊत पुणे : सेंद्रिय शेतीचे महत्व व या सेंद्रिय उत्पादनांची लोकप्रियता लक्षात घेता, शासनस्तरावरून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे़. यातून सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसारही होत आहे़. परंतू दुसरीकडे बाजारात बनावट सेंद्रिय शेती उत्पादनांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे़. केवळ ‘सेंद्रिय उत्पादन लेबल’ लावून, आहे तोच माल चढ्या किंमतीने विकून ग्राहकांची राजरोसपणे फसवणुक सुरू असल्याने सेंद्रिय शेती उत्पादनांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे़. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या एकूण शेतीपैकी ७ लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाते़. यामध्ये परंपरागत रसायनांचा वापर न करणारे डोंगराळ व आदिवासी क्षेत्र यांचाही समावेश आहे़. यापैकी ३ लाख ३८ हजार ११७ हेक्टर क्षेत्रावर राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रीय शेती (पंरपरागत कृषी विकास योजना) विकास योजनेंतर्गत उत्पादन घेणे सुरू आहे़. या सेंद्रीय उत्पादनांना सहभाग हमी पध्दतीने (पीजीएस) प्रमाणिकरण केले जात आहे़. परंतू हे प्रमाणिकरण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्राह्य धरले जात नाही़. तरअपेडामार्फत मान्यताप्राप्त खाजगी प्रमाणिकरण संस्थांकडून झालेले सेंद्रिय शेती उत्पादनाचे प्रमाणिकरण अधिक विश्वासार्ह असून, या प्रमाणिकरणास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मान्यताही आहे़. यामुळे पीजीएसला अधिक सक्षम करणे जरूरी आहे़. दरम्यान राज्य शासनानेही याची दखल घेऊन आता सेंद्रिय शेतीला राज्य शासनाची मोहोर उमटवून अधिक विश्वासार्ह बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़. याकरिता पीजीएस व्यतिरिक्त व अधिक विश्वासार्ह प्रमाणिकरणाकरिता महाराष्ट्र शासनाने सिक्कीम राज्याच्या धर्तीवर सेंद्रिय शेती उत्पादन प्रमाणिकरण यंत्रणा उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत़. -----भारतातून सुमारे साडेतीन हजार कोटी रूपयांची निर्यात अपेडाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताने सन २०१८ मध्ये प्रमाणित सेंद्रिय उत्पादनांचे अंदाजे १़७० दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन केले आहे़. यामध्ये प्रामुख्याने तेल बियाणे, ऊस, तृणधान्ये, कापूस, कडधान्ये, औषधी वनस्पती, चहा, फळे, मसाले, सुकामेवा, भाजीपाला या सर्व प्रकारच्या उत्पादनांचा समावेश आहे. यामध्ये नियार्तीचे एकूण प्रमाण ८.८८ लाख मेट्रिंक टन होते़ या सेंद्रिय अन्न नियार्तीचे मूल्य हे ३४,३़४८ कोटी रूपये (५१५़४४ दशलक्ष डॉलर्स) इतके आहे़. ही सेंद्रिय उत्पादने अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंड, आॅस्ट्रेलिया, इस्राईल, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, न्यूझीलंड, जपान इत्यादी देशांत निर्यात केली गेली़. --- 

* सेंद्रिय शेतीत महाराष्ट्र आघाडीवर पण प्रमाणिकराअभावी आंतरराष्ट्रीय बाजार कमी देशामध्ये सिक्कीम राज्य हे संपूर्णपणे सेंद्रिय शेती करणारे राज्य असले तरी, सेंद्रीय शेती क्षेत्राची तुलना करता महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे़ मात्र तरीही महाराष्ट्रात पाहिजे तसा सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसार झालेला नाही़ किंबहुना या उत्पादनांना मिळणारी पीजीएस प्रमाणिकरण इतर प्रमाणिकराच्या तुलनेत खूपच कमी पडत आहे़ देशात महाराष्ट्रखालोखाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांच्यानंतर मध्य प्रदेश हे सर्वात मोठे सेंद्रिय उत्पादक राज्य आहे. वस्तूंच्या बाबतीत तेल बियाणे ही सर्वात मोठी श्रेणी असून त्यानंतर ऊस, तृणधान्ये, कडधान्ये, औषधी, हर्बल आणि सुगंधी वनस्पती आणि मसाले यांचा समावेश आहे़ ------------* बनावट सेंद्रिय शेती उत्पादनांना आळा घालण्याकरिता कायदा लवकरच बाजारातील बनावट सेंद्रिय शेती उत्पादनांना आळा घालण्याकरिता शासन गांभिर्याने कार्यवाही करीत असून, या फसवेगिरीला आळा बसविण्याकरिता शासन सेंद्रिय शेतीकरिताचा स्वतंत्र कायदा अंमलात आणणार आहे़ यामुळे शासनाची स्वत:ची नियमावली अस्थित्वात येणार आहे़ तसेच सेंद्रिय शेती विषयक ग्राहकांमध्ये जागृत करून, दर्जेदार व विश्वासार्ह सेंद्रिय शेती उत्पादनांचा पुरवठा करणे यासाठी शासन प्रयत्नशील आहे़  

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजारGovernmentसरकार