शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

फडणवीस ‘बोगस’, सदाभाऊ ‘भामटा’, तर पवार ‘अविश्वासू’ - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:34 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘बोगस माणूस’,मंत्री सदाभाऊ खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात केला.

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘बोगस माणूस’,मंत्री सदाभाऊ खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात केला.

स्वातंत्र्यानंतर देशात ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या गरिबी हटाओ व पाकिस्तानच्या मुद्यावर लढल्या गेल्या; पण २०१९ ची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढली जाणार आहे. ही ताकद शेतकरी नेत्यांच्या एकजुटीबरोबर चळवळीची असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरात रविवारी (10 फेब्रुवारी) एका खासगी कार्यक्रमात त्यांनी महाविद्यालयीन तरुणांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. त्यामध्ये ‘रॅपिड फायर’मध्ये ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? असे प्रश्न विचारण्यात आले, यावर फडणवीस ‘बोगस माणूस’, खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचे उत्तर त्यांनी दिले.

शरद जोशी यांचा महामानव असा उल्लेख करत शेट्टी यांनी चर्चेला सुरुवात केली. आंदोलन आणि दंगल यात फरक असून, दंगलीबद्दल तिरस्कार असतो. आंदोलनातून इतरांना त्रास होतो, हे जरी खरे असले, तरी शिवारातील वेदना घरापर्यंत पोहोचली तर स्फोट होण्यास वेळ लागत नाही. शेतकरी नेत्यांत जरूर मतभिन्नता आहे; पण ध्येय एकच आहे. त्यातूनच गेल्या दोन वर्षांत देशपातळीवर अनेक आंदोलने उभारली, त्या माध्यमातून काही मागण्या मान्यही करून घेतल्या. काँग्रेस की बहुजन विकास आघाडीसोबत जाणार हे ठरलेले नाही; पण माझी वैचारिक भूमिका ठरलेली आहे. राज्य घटनेला आव्हान देणाºयासोबत कदापि जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राजकारण गेले खड्ड्यात, शेतकºयांच्या घामाचे पैसे महत्त्वाचे आहेत. कोणाच्यात दम असेल, तर अशी उघड भूमिका घ्यावी, असे आव्हानही शेट्टी यांनी दिले.शेट्टींना केलेले प्रश्न, कंसात उत्तरे

शेतकरी की लेखक (लेखक), दिल्ली की मुंबई (केव्हाही दिल्लीच), कोणाची भीती वाटते (भीतीच नाही), राग आला तर (डोळे मिटतो), मनाला लागलेला आरोप (जमिनी घेतल्याचा), काय करायला नको होते (महायुती).

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारSadabhau Khotसदाभाउ खोत