शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

एसआरपीएफ जवानांच्या बदलीचा मार्ग सुकर

By admin | Updated: February 25, 2015 02:13 IST

राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दीड हजारांवर जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या

यवतमाळ : राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दीड हजारांवर जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या एका आदेशाने सुकर झाला आहे. सुमारे दीड वर्षापासून या बदल्या रखडल्या होत्या. ९ मार्चपूर्वी या बदल्या करण्याची लेखी हमी पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे. एसआरपीएफमध्ये दहा वर्षे सेवा झालेल्या जवानांची जिल्हा पोलीस दलात बदली केली जाते. त्यासाठी तेथील पोलीस भरतीच्या दहा टक्के जागा रिक्त ठेवल्या जातात. परंतु २०१४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे कारण पुढे करून जवानांच्या बदल्या थांबविल्या गेल्या होत्या. या विरोधात पुणे येथील एसआरपीएफचे सहायक फौजदार नितीन पराळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी न्या. नरेश पाटील व न्या. ए.एस. गडकरी यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. एसआरपीएफ जवानांच्या रखडलेल्या बदल्या दोन आठवड्यांत करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. एसआरपीएफच्या अपर महासंचालकांतर्फे पोलीस उपमहानिरीक्षक विजयसिंह जाधव यांनी स्वत: न्यायालयात उपस्थित राहून ‘दोन आठवड्यांत बदल्या करून यादी न्यायालयापुढे ठेवू’ अशी लेखी हमी दिली. (प्रतिनिधी)