शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

साहेब, निवडणुकांच्या माहोलमधून बाहेर पडा अन् पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 12:06 IST

राज्यातील बहुतांश भागात पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत.

मुंबई - राज्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची पीक पाण्याखाली गेली आहेत. हाताशी आलेला खास पावसाने हिरावून नेलाय. राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने आणि प्रशासनाने निवडणुकांच्या माहोलमधून बाहेर येऊन आता, शेतकऱ्यांच्या नुकसानीची चिंता करायला हवी. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी पंचनामे करण्याची मागणी केली आहे.  

राज्यातील बहुतांश भागात पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. किडीचा प्रादूर्भावही वाढला आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी जिल्हा प्रशासनाकडे ते अद्याप पोहोचलेले नाहीत. त्यामुळे पंचनाम्याच्या कामाला सुरवातही झालेली नाही. तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळू शकेल, असेही मुंडेंनी म्हटले आहे. 

परतीच्या पावासाचा फटका ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक ठिकाणी उभारलेली पीके जमीनदोस्त झाली आहेत. पावसाच्या पाण्यात सोयाबीनसह इतरही पिकांचं नुकसान झालं आहे. आधीच दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्याला यंदा ओला दुष्काळ मारक ठरत आहे. त्यामुळे, सरकारच्या आदेशाचे पालन करुन जिल्हा प्रशासनाने गतीमान होऊन पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची गरज असल्याचे मुंडेंनी म्हटलंय.  

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईNCPराष्ट्रवादी काँग्रेसRainपाऊसFarmerशेतकरी