शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

साहेब, निवडणुकांच्या माहोलमधून बाहेर पडा अन् पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 12:06 IST

राज्यातील बहुतांश भागात पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत.

मुंबई - राज्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची पीक पाण्याखाली गेली आहेत. हाताशी आलेला खास पावसाने हिरावून नेलाय. राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने आणि प्रशासनाने निवडणुकांच्या माहोलमधून बाहेर येऊन आता, शेतकऱ्यांच्या नुकसानीची चिंता करायला हवी. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी पंचनामे करण्याची मागणी केली आहे.  

राज्यातील बहुतांश भागात पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. किडीचा प्रादूर्भावही वाढला आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे, युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी जिल्हा प्रशासनाकडे ते अद्याप पोहोचलेले नाहीत. त्यामुळे पंचनाम्याच्या कामाला सुरवातही झालेली नाही. तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळू शकेल, असेही मुंडेंनी म्हटले आहे. 

परतीच्या पावासाचा फटका ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक ठिकाणी उभारलेली पीके जमीनदोस्त झाली आहेत. पावसाच्या पाण्यात सोयाबीनसह इतरही पिकांचं नुकसान झालं आहे. आधीच दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्याला यंदा ओला दुष्काळ मारक ठरत आहे. त्यामुळे, सरकारच्या आदेशाचे पालन करुन जिल्हा प्रशासनाने गतीमान होऊन पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची गरज असल्याचे मुंडेंनी म्हटलंय.  

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईNCPराष्ट्रवादी काँग्रेसRainपाऊसFarmerशेतकरी