शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ-मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय

By admin | Updated: March 14, 2015 05:10 IST

विदर्भ व मराठवाडा वगळून उर्वरित महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ठरविताना केळकर समितीने केवळ शहरी भागांचा विचार केला आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राबाबत

सुधीर लंके, पुणेविदर्भ व मराठवाडा वगळून उर्वरित महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ठरविताना केळकर समितीने केवळ शहरी भागांचा विचार केला आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राबाबत आकस ठेऊनच हा अहवाल बनलेला दिसतो, असा आक्षेप उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाने घेतला आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठीही जलसंधारण तसेच दुग्ध विकासासाठी धोरणे आखण्याची गरज महामंडळाने राज्यपालांना पाठविलेल्या अहवालात व्यक्त केली आहे.केळकर समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी महामंडळाचे मावळते अध्यक्ष मदन पाटील, सदस्य सचिव प्रदीप व्यास, सदस्य पोपटराव पवार, बुधाजीराव मुळीक, विजय आहेर, सुभाष खेमनर, बु.का. लोखंडे यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतीच बैठक झाली. या वेळी महामंडळाने समितीच्या अहवालावर अनेक आक्षेप घेतले. शहरांतील दरडोई उत्पन्न गृहीत धरल्याने उर्वरित महाराष्ट्र सधन वाटतो. त्यामुळे शहरांऐवजी तालुका हा घटक विचारात घेऊन नियोजन व्हावे, अशी मुख्य सूचना या वेळी करण्यात आली. विदर्भात मालगुजारी तलाव व खारजमिनींचा पट्टा सुधारण्यासाठी तरतूद दाखविण्यात आली आहे. विदर्भाप्रमाणेच उर्वरित महाराष्ट्रातही १९७२ च्या दुष्काळात बांधलेले पाझर तलाव आहेत. त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे. उर्वरित महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर अवर्षणप्रवण भाग असून तेथे ओढ्यांतील पाणलोटासोबतच डोंगरमाथ्यांवर ही कामे करण्याची गरज आहे. औद्योगिकीकरणामुळे या भागातील नद्या प्रदूषित व मृत झाल्या आहेत. समुद्र दूषित झाल्याने मच्छिमारही अडचणीत आले आहेत. याबाबत धोरण ठरविण्याची गरज आहे. कालव्यांसोबतच धरणांतून बंद नळाने पाणी पुरवठा करण्याचे धोरण घ्यावे लागेल. पश्चिमेत वाहून जाणारे पाणी पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे लागेल, अशा शिफारशी समितीने केल्या आहेत.