शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:23 IST

Maharashtra Flood Exam fee Waive Off: अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Devendra Fadnavis Latest News: सप्टेंबर अखेर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेली पिके सडली. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरणंही कठीण असून राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. तब्बल दोन हजार ६९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्याने २९ जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. 

शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षेचे शुल्क माफ

अतिवृष्टी झाल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती. राज्य सरकारने असा निर्णय घेणे नियमानुसार शक्य नसल्याचे स्पष्ट केले. मात्र दुष्काळाच्या काळात ज्या उपाययोजना केल्या जातात, त्या केल्या जाणार असल्याचे जाहीर केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ओला दुष्कार जाहीर करण्याची मागणी होत आहे. त्यासंदर्भात आम्ही जी घोषणा केली होती, त्यानुसार टंचाई ज्याला आपण दुष्काळ म्हणतो. त्या काळातील ज्या उपाययोजना आहेत. ओला दुष्काळ समजून त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यात जमीन महसूलात सूट, कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाचे वीज बिल लागत नाहीये, त्यामुळे तो विषय संपला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करणार आहोत', अशी माहिती फडणवीसांनी दिली. 

राज्य सरकारकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीचा २९ जिल्ह्यांना फटका बसला आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ केले जाणार आहे. 

या निर्णयाचा मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. 

शेतकऱ्यांना किती रुपये नुकसान भरपाई मिळणार?

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे कोरडवाहूला प्रति हेक्टर ८५०० रुपये देतो, हंगामी बागायतीला प्रति हेक्टर १७००० रुपये, तर बागायतीला प्रति हेक्टर २२००० रुपये देतो. त्याप्रमाणे जवळपास ६२ लाख हेक्टर करता ६ हजार १७५ कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

शेतकऱ्यांना रब्बीचे पिक घेता यावे, त्यासाठी बियाणे आणि इतर गोष्टींसाठी प्रति हेक्टर अतिरिक्त दहा रुपये राज्य सरकारकडून दिले जाणार आहे. यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपये लागणार आहेत. दहा हजाराची ही रक्कम पकडून कोरडवाहू शेतकऱ्याला हेक्टरी १८५०० रुपये मिळतील, हंगामी बागायती शेतकऱ्याला हेक्टरी २७००० रुपये मिळतील. बागायतदार शेतकऱ्याला ३२५०० रुपये मिळणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Govt Relieves Rain-Hit Students; CM Announces Fee Waiver

Web Summary : The Maharashtra government waived exam fees for students in rain-affected areas. CM Fadnavis announced this relief due to crop losses and financial hardship caused by heavy rainfall in 29 districts. Farmers will also receive compensation, with increased amounts for rabi crops.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसexamपरीक्षाfloodपूरStudentविद्यार्थीSchoolशाळाcollegeमहाविद्यालय