शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यावर अमित शाहांना हसू आवलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
2
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
3
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
4
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
5
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
6
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
7
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
8
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
9
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
10
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
11
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
12
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
13
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
14
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
15
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
16
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
17
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
18
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
19
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:23 IST

Maharashtra Flood Exam fee Waive Off: अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Devendra Fadnavis Latest News: सप्टेंबर अखेर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेली पिके सडली. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरणंही कठीण असून राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. तब्बल दोन हजार ६९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्याने २९ जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले आहे. 

शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षेचे शुल्क माफ

अतिवृष्टी झाल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती. राज्य सरकारने असा निर्णय घेणे नियमानुसार शक्य नसल्याचे स्पष्ट केले. मात्र दुष्काळाच्या काळात ज्या उपाययोजना केल्या जातात, त्या केल्या जाणार असल्याचे जाहीर केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ओला दुष्कार जाहीर करण्याची मागणी होत आहे. त्यासंदर्भात आम्ही जी घोषणा केली होती, त्यानुसार टंचाई ज्याला आपण दुष्काळ म्हणतो. त्या काळातील ज्या उपाययोजना आहेत. ओला दुष्काळ समजून त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यात जमीन महसूलात सूट, कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाचे वीज बिल लागत नाहीये, त्यामुळे तो विषय संपला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करणार आहोत', अशी माहिती फडणवीसांनी दिली. 

राज्य सरकारकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीचा २९ जिल्ह्यांना फटका बसला आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ केले जाणार आहे. 

या निर्णयाचा मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. 

शेतकऱ्यांना किती रुपये नुकसान भरपाई मिळणार?

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे कोरडवाहूला प्रति हेक्टर ८५०० रुपये देतो, हंगामी बागायतीला प्रति हेक्टर १७००० रुपये, तर बागायतीला प्रति हेक्टर २२००० रुपये देतो. त्याप्रमाणे जवळपास ६२ लाख हेक्टर करता ६ हजार १७५ कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

शेतकऱ्यांना रब्बीचे पिक घेता यावे, त्यासाठी बियाणे आणि इतर गोष्टींसाठी प्रति हेक्टर अतिरिक्त दहा रुपये राज्य सरकारकडून दिले जाणार आहे. यासाठी ६ हजार ५०० कोटी रुपये लागणार आहेत. दहा हजाराची ही रक्कम पकडून कोरडवाहू शेतकऱ्याला हेक्टरी १८५०० रुपये मिळतील, हंगामी बागायती शेतकऱ्याला हेक्टरी २७००० रुपये मिळतील. बागायतदार शेतकऱ्याला ३२५०० रुपये मिळणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Govt Relieves Rain-Hit Students; CM Announces Fee Waiver

Web Summary : The Maharashtra government waived exam fees for students in rain-affected areas. CM Fadnavis announced this relief due to crop losses and financial hardship caused by heavy rainfall in 29 districts. Farmers will also receive compensation, with increased amounts for rabi crops.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसexamपरीक्षाfloodपूरStudentविद्यार्थीSchoolशाळाcollegeमहाविद्यालय