शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...तरी पवारांच्या नखावरील धूळही उडणार नाही, जितेंद्र आव्हाडांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 07:59 IST

बावनकुळे यांनी पवार यांचे बारामतीमध्ये विसर्जन करण्याची भाषा केली होती. त्यांच्या वक्तव्याचा आव्हाड यांनी समाचार घेतला.

ठाणे : भाजपकडे सध्या कोणताही मुद्दा नसल्याने भाजपचे नेते शरद पवारांवर बोलत आहेत. बावनकुळेच नव्हे एकलाखकुळे जरी खाली उतरले, तरी पवार या सह्याद्रीच्या पहाडाला काहीही फरक पडणार नाही. त्यांच्या पायाच्या नखावरील धूळही तुम्ही उडवू शकणार नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. 

बावनकुळे यांनी पवार यांचे बारामतीमध्ये विसर्जन करण्याची भाषा केली होती. त्यांच्या वक्तव्याचा आव्हाड यांनी समाचार घेतला.   ते म्हणाले, १९९३ ते ९५ या काळात गो. रा. खैरनार आणि भाजपचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांनी पवार यांच्यावर बेछूट आरोप केले. तेव्हा एकच लक्षात आले की, पवारांवर आरोप केला की बातमीची सोय होते. त्या पलीकडे काहीच होत नसल्याचे आव्हाड म्हणाले. भारताच्या राजकारणात उद्ध्वस्त करु, विसर्जन करू, असा शब्दप्रयोग कधीही आणि कुणीही केलेला नाही, असे शब्द वापरणाऱ्यांना त्यांचे शब्द लखलाभ होवो, असेही ते म्हणाले. जय-पराजय हा लोकशाहीचा भाग असला तरी नेत्याने काय शब्द वापरावेत, याचे भान ठेवले पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला सर्वकाही माहीत आहे. यापूर्वी पवार यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्या आरोपांचे पुढे काय झाले, हे महाराष्ट्राच्या जनतेला ज्ञात आहे. या कृत्यातून तुमच्या वयाच्या दुप्पट वय असलेल्या माणसाला तुम्ही किती घाबरतात, हेच दिसून येते. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेSharad Pawarशरद पवार