शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
2
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
3
पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
4
Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
5
व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...
6
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
7
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
8
३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
9
म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी
10
अमेरिकेच्या संसदेत मोदी-पुतिन यांच्या 'त्या' फोटोवर खळबळ; महिला खासदाराचा ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर हल्लाबोल
11
FD चे व्याजदर कमी झाल्याने बॉन्डमध्ये गुंतवणूक करताय? 'हे' ५ मोठे धोके तुम्हाला माहीत असायलाच हवेत
12
"इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर..."; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
सीसीटीव्ही फोटो, व्हायरल व्हॉट्सअॅप चॅट्स; DSP कल्पना वर्मांनी सांगितलं मूळ प्रकरण काय?
14
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून विराट-रोहितचं होणार डिमोशन? BCCI देणार मोठा धक्का, तर ‘या’ खेळाडूंना मिळणार प्रमोशन
15
"मला गुन्हा कबूल नाही." राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर; न्यायाधीश म्हणाले, सहकार्य करा, काय घडलं?
16
ठंडा-ठंडा, कूल-कूल! मुंबई माथेरानपेक्षा थंड, राज्यातील बहुतांशी शहरं १० अंशावर
17
Mumbai Airport: मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, 'या' विमानांत स्फोटकं, दर अर्ध्या तासाला उडवून देणार!
18
भयंकर! पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; कॉन्स्टेबलच्या कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
'धुरंधर' पाहून भारावला हृतिक रोशन; म्हणाला, "सिनेमाचा विद्यार्थी म्हणून खूप काही शिकलो..."
20
"पाकिस्तानात मॉल कुठून आला?", 'धुरंधर'मधील 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:48 IST

या समितीने अलीकडेच केरळ मॉडेलचा अभ्यास केला. पुढील २ महिन्यात याबाबतचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे.

मुंबई - राज्याचं महसूल उत्पन्न वाढवण्यासाठी येत्या काळात महाराष्ट्र सरकार राज्यात लॉटरी विक्रीचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. जर खरेदीदाराने तिकीट खरेदी करून त्याला लॉटरी लागली नाही, तर त्याचे पैसे फुकट जाणार नाही. तिकीटासाठी त्याने दिलेले पैसे राज्य सरकारकडे जमा राहतील आणि ३ किंवा ५ वर्षांनी ती रक्कम त्या व्यक्तीला व्याजासह परत करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. 

महाराष्ट्र राज्य लॉटरी वाचविण्यासाठी सरकारने एक समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्ष माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, आम्ही सध्या एका मॉडेलचा अभ्यास करत आहे. यात एखाद्या व्यक्तीने तिकीट खरेदी केली आणि लॉटरी जिंकली नाही तर त्याचे पैसे राज्य सरकारकडे जमा राहतील. ३ ते ५ वर्षांनी ती रक्कम व्याजासह त्या व्यक्तीला परत केले जातील. यातून त्याचाही फायदा होईल, शिवाय लॉटरी एक जुगार आहे हा समजदेखील पुसला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे. 

या समितीने अलीकडेच केरळ मॉडेलचा अभ्यास केला. पुढील २ महिन्यात याबाबतचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. लॉटरी क्षेत्रातून महसूल वाढवण्यासाठी एप्रिल २०२५ मध्ये सर्वपक्षीय समितीची स्थापना करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू ठेवायची तर तिच्यापासूनचे उत्पन्न कसे वाढविता येईल, याचा अभ्यास करून या समितीने राज्य सरकारला शिफारशी करायच्या होत्या. या समितीचे काम सध्या सुरू असून त्यांचा अहवाल अर्थ विभागाकडे सादर होईल त्यानुसार लॉटरीबाबतचा निर्णय घेतला जाईल. समितीच्या विचाराधीन असलेल्या प्रस्तावात इतर उपाययोजनांसह सुरक्षेची खबरदारी घेत लॉटरी तिकीट खरेदी करण्यासाठी हजारो एटीएम मशिनचा वापर करण्याचीही शिफारस असल्याचं बोललं जाते. 

ही समिती ऑनलाइन लॉटरीच्या बाजूने शिफारस करण्याची शक्यता कमी आहे. लॉटरीला गुंतवणुकीचं माध्यम बनवण्याच्या दृष्टीने अभ्यास सुरू आहे. राज्याचा महसूल लॉटरी विक्रीतून कसा वाढवता येईल याला समितीचे प्राधान्य आहे. परंतु हे करताना वाढलेला महसूल भविष्याच्या दृष्टीकोनातून उत्पादन क्षेत्रात वळवला पाहिजे. राज्याला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारा हा अहवाल असेल असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. तसेच लॉटरीचं व्यसनात रुपांतर व्हावे हा हेतू नाही. समितीत आम्ही ऑनलाइन लॉटरीच्या विरोधात भूमिका घेतली, त्यातून तरुण मुले आकर्षिक होऊ शकतात. त्यामुळे सरकारने काय करावे हे आम्ही सुचवणार नाही त्याऐवजी अहवालात सरकारसमोर तथ्य मांडली जातील असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांनी म्हटलं. 

समितीने काय केला अभ्यास?

समितीच्या मते, केरळ लॉटरी क्षेत्राची वार्षिक उलाढाल सुमारे १२ हजार कोटी आहे. त्यातून ३ ते ४ हजार कोटी नफा होता. हे पैसे पगार किंवा कर्जावरील व्याज यासारख्या नियमित खर्चावर वाया जाऊ न देता ते थेट उत्पादन क्षेत्रात गुंतवले जातात. त्यातून राज्यात परिवर्तन होऊ शकते. महाराष्ट्रात लॉटरी क्षेत्राची उलाढाल फक्त ३०-३५ कोटी आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून यातून महसूल वाढवण्यासाठी मार्ग शोधत आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरी १२ एप्रिल १९६९ पासून अस्तित्वात आहे. मटकासारख्या जुगारातून सामान्यांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्याच्या वित्त विभागाने लॉटरी सुरू केली होती. लॉटरी विक्रीतून मिळणारा महसूल पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, आरोग्य आणि शिक्षणावर गुंतवला जातो. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारgovernment schemeसरकारी योजना