शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 20:08 IST

पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे़.

ठळक मुद्देमराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्हे पावसाच्या प्रतिक्षेतपावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी

पुणे : पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे़. मराठवाड्यात ३१ टक्के तर विदर्भात ३० टक्के पाऊस सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़. त्यामुळे या जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या असून जेथे शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांचे आता पावसासाठी आकाशाकडे डोळे लागले आहेत़. राज्यात सध्या केवळ कोकण, गोव्यात प्रामुख्याने पाऊस सर्वदूर होत असून मध्य महाराष्ट्रातील घाटमथ्यावरील भागात पाऊस आहे़.  मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होताना दिसत आहे़ कोकण, गोव्यात सरासरीच्या २० टक्के पाऊस अधिक झाला आहे़.  मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असली तरी अहमदनगर (८ टक्के), पुणे (७५ टक्के), सातारा (२१टक्के), कोल्हापूर (२६ टक्के) या जिल्ह्यात जादा पावसाची नोंद झाली आहे़.  सोलापूरला तब्बल (-५० टक्के), सांगली (-१५ टक्के) कमी पाऊस झाला आहे़. उत्तर महाराष्ट्रातील केवळ नाशिक जिल्ह्यात २१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून नंदुरबार (- ३६ टक्के), जळगाव (-१७ टक्के), धुळे (-१६ टक्के) या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे़. मराठवाड्यात १ जून ते १४ जुलै अखेर सरासरीपेक्षा तब्बल ३१ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे़.  हिंगोली (- ४६ टक्के) व नांदेड (- ४५ टक्के) या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी पाऊस झाला असून बीड (-३७ टक्के), परभणी (-३४ टक्के), उस्मानाबाद (-२६ टक्के), लातूर (-३२ टक्के), जालना (-१७ टक्के), औरंगाबाद (-८ टक्के) कमी पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण विदर्भात सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाला़. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते़. मात्र, त्याचा सर्व रोख हा ओडिशा व मध्य प्रदेशाच्या दिशेने राहिल्याने बुलढाणा वगळता विदर्भाला त्याचा जास्त फायदा होऊ शकला नाही़. विदर्भातील यवतमाळ (-५१ टक्के), वर्धा (-४३ टक्के), वाशिम (-४१ टक्के), अमरावती (- ३९ टक्के), भंडारा (- ३१ टक्के), अकोला (- २८ टक्के), चंद्रपूर (-२३ टक्के), गोंदिया (-३७ टक्के), नागपूर (-२६ टक्के), गडचिरोली (- २० टक्के) या जिल्ह्यात पावसाची नितांत गरज आहे़. केवळ बुलढाणा (-३ टक्के) सरासरीच्या जवळपास पाऊस आतापर्यंत झाला आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरात सध्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती नसल्याने मराठवाडा व विदर्भात सध्या मोठ्या पावसाच्या दृष्टीने अनुकुल परिस्थिती नाही़. त्यामुळे मराठवाडा व विदर्भातील खरीप पेरण्यांवर त्याचा प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसdroughtदुष्काळVidarbhaविदर्भ