शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

पावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 20:08 IST

पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे़.

ठळक मुद्देमराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्हे पावसाच्या प्रतिक्षेतपावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी

पुणे : पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे़. मराठवाड्यात ३१ टक्के तर विदर्भात ३० टक्के पाऊस सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़. त्यामुळे या जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या असून जेथे शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांचे आता पावसासाठी आकाशाकडे डोळे लागले आहेत़. राज्यात सध्या केवळ कोकण, गोव्यात प्रामुख्याने पाऊस सर्वदूर होत असून मध्य महाराष्ट्रातील घाटमथ्यावरील भागात पाऊस आहे़.  मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होताना दिसत आहे़ कोकण, गोव्यात सरासरीच्या २० टक्के पाऊस अधिक झाला आहे़.  मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असली तरी अहमदनगर (८ टक्के), पुणे (७५ टक्के), सातारा (२१टक्के), कोल्हापूर (२६ टक्के) या जिल्ह्यात जादा पावसाची नोंद झाली आहे़.  सोलापूरला तब्बल (-५० टक्के), सांगली (-१५ टक्के) कमी पाऊस झाला आहे़. उत्तर महाराष्ट्रातील केवळ नाशिक जिल्ह्यात २१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून नंदुरबार (- ३६ टक्के), जळगाव (-१७ टक्के), धुळे (-१६ टक्के) या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे़. मराठवाड्यात १ जून ते १४ जुलै अखेर सरासरीपेक्षा तब्बल ३१ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे़.  हिंगोली (- ४६ टक्के) व नांदेड (- ४५ टक्के) या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी पाऊस झाला असून बीड (-३७ टक्के), परभणी (-३४ टक्के), उस्मानाबाद (-२६ टक्के), लातूर (-३२ टक्के), जालना (-१७ टक्के), औरंगाबाद (-८ टक्के) कमी पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण विदर्भात सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाला़. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते़. मात्र, त्याचा सर्व रोख हा ओडिशा व मध्य प्रदेशाच्या दिशेने राहिल्याने बुलढाणा वगळता विदर्भाला त्याचा जास्त फायदा होऊ शकला नाही़. विदर्भातील यवतमाळ (-५१ टक्के), वर्धा (-४३ टक्के), वाशिम (-४१ टक्के), अमरावती (- ३९ टक्के), भंडारा (- ३१ टक्के), अकोला (- २८ टक्के), चंद्रपूर (-२३ टक्के), गोंदिया (-३७ टक्के), नागपूर (-२६ टक्के), गडचिरोली (- २० टक्के) या जिल्ह्यात पावसाची नितांत गरज आहे़. केवळ बुलढाणा (-३ टक्के) सरासरीच्या जवळपास पाऊस आतापर्यंत झाला आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरात सध्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती नसल्याने मराठवाडा व विदर्भात सध्या मोठ्या पावसाच्या दृष्टीने अनुकुल परिस्थिती नाही़. त्यामुळे मराठवाडा व विदर्भातील खरीप पेरण्यांवर त्याचा प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसdroughtदुष्काळVidarbhaविदर्भ