शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी भारतातील तिसऱ्या क्रमांकाची शाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 2:50 AM

बी.ए. आणि बी.एससीनंतर इंजिनिअरिंगच्या पदवीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्रवेश घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते

- सीमा महांगडे मुंबई : राज्यात इंजिनिअरिंगच्या ४३ टक्के जागा रिक्त राहिल्या असून आॅल इंडिया सर्व्हे आॅफ हायर एज्युकेशनच्या सर्वेक्षणानुसार, इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी ही विद्यार्थ्यांची पसंती असलेली देशातील तिसºया क्रमांकाची शाखा असल्याचे समोर आले आहे.बी.ए. आणि बी.एससीनंतर इंजिनिअरिंगच्या पदवीसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्रवेश घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०१७-१८ च्या अहवालानुसार देशात बॅचलर आॅफ इंजिनिअरिंगसाठी १८.२ लाख, तर बॅचलर आॅफ टेक्नोलॉजीसाठी २१.१९ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. इंजिनीअरिंग आणि टेक्नोलॉजीच्या आणखी १९ उपशाखा आहेत. त्यातही मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या पाच सगळ्यात जास्त मागणी असणाºया उपशाखा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.देशात १.९२ लाख विद्यार्थी इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत, तर ३८,७१४ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. साठी प्रवेश घेतला आहे. पीएच.डी.साठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सर्वात जास्त ५,३४९ विद्यार्थी आहेत. त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचा क्रमांक लागतो. त्यासाठी ५,२३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पदव्युत्तर शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक ३५,९६७ इतकी आहे.पॉलिटेक्निकच्या प्रवेशात महाराष्ट्र दुसरापॉलिटेक्निकसाठी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र देशात दुसºया स्थानी असून त्यांची संख्या २ लाख इतकी आहे, तर ३ लाख ४९ हजार विद्यार्थ्यांसह तामिळनाडू प्रथम क्रमांकावर आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानEducationशिक्षण