शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

राज्यातील साखर कारखान्यांमध्ये नोकरभरतीला मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 23:00 IST

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधांचे नोकरभरतीचे मनसुबे धुळीला ?

ठळक मुद्देनिवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काही सत्ताधाऱ्यांना हा निर्णय अडचणीचा ठरणार राज्य शासनाने नोकरभरती रोखुन साखर कारखानदारीतील सत्ताधाऱ्यांना धक्का देणारा निर्णय

- प्रशांत ननवरे-बारामती : राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा आकृतिबंध निश्चित करण्यात येणार आहे.हा आकृतीबंध निश्चित  होवून त्यास शासनाची मान्यता मिळेपर्यंत राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने कोणत्याही प्रकारची नोकरभरती करू नये,असे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांचे नोकरभरतीचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत.        जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या निवडणुकांचे पडघम वाजु लागले आहेत.मात्र,याच दरम्यान राज्य शासनाने नोकरभरती रोखुन साखर कारखानदारीतील सत्ताधाऱ्यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे.त्यामुळे तोंडावर आलेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काही सत्ताधाऱ्यांना हा निर्णय अडचणीचा ठरणार आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा अधिकारी,कर्मचारी यांचा आकृतिबंध कसा असावा, याबाबत साखर आयुक्तांनी साखरसंचालकांच्या   अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. तसेच, समितीने सादरकेलेल्या अहवालाच्या अनुषंगाने आकृतिबंध निश्चित करण्याचे कामप्रगतीपथावर आहे.राज्यातील बहुसंख्य साखर कारखाने हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. उसउत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी ची रक्कम वेळेत देणेही अडचणीचे ठरत आहे.काही कारखान्याच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. त्यामुळे कारखान्याच्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक झालेले आहे.या पार्श्वभुमीवर राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा आकृतिबंध निश्चितहोवून त्यास शासनाची मान्यता मिळेपर्यंत राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने कोणत्याही प्रकारची नोकर भरती करू नये. साखर आयुक्तांनी याबाबत हे आदेश साखर कारखान्याच्या निदर्शनास आणावेत,त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी, असे आदेश सहकारविभागाचे सचिव प्रमोद वळंज यांनी दिले आहेत.या निर्णयाबाबत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ''लोकमत' शी  बोलताना सांगितले की,  राज्यातील साखर कारखान्यांनीआकृतीबंधाप्रमाणेच नोकरभरती करणे आवश्यक आहे. कामगारांना पगारवाढ दिलीजाते, दरवर्षी ८.३३ टक्के बोनस दिला जातो. ते देण्याबाबत दुमत नाही. पगारवाढ आणि बोनस कामगारांना मिळालाच पाहिजे.तो त्यांचा हक्क आहे.मात्र, अनावश्यक भरती करु नये. शेतकरी आणि कामगार एकाच रथाची दोनचाके आहेत. दोन्ही समाधानी राहणे आवश्यक आहे. सहकारी साखर कारखान्याचामालक असणारा ऊस उत्पादक सभासद बाजुला टाकला जावु नये,याची दक्षता घेण्याचीगरज जाचक यांनी व्यक्त केली.———————————————

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेEmployeeकर्मचारीState Governmentराज्य सरकार