शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

एल्गार परिषदः "शरद पवारांनी 'ती' कागदपत्रं उघड करून मोदी सरकारचा पर्दाफाश करावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 18:50 IST

एल्गार परिषदेच्या तपासावर शंका उपस्थित करणाऱ्या शरद पवारांना डॉ. प्रकाश आंबेडकरांची विनंती....

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेच्या तपासाबाबत शंका उपस्थित केली होती. हे तपास प्रकरण बनावट असून त्याविषयीचे  पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पवार यांनी लिहिले होते. तसेच एसआयटीमार्फत एल्गार प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी देखील केली होती. मात्र त्याचवेळी केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे वर्ग केले. आता पवारांनी त्यांच्याकडील महत्वाची कागदपत्रे सार्वजनिक करून केंद्र सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, अशी विनंती वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 

राज्यात सत्तांतर होऊन भाजपची सत्ता गेली व महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच हे सर्व तपास प्रकरण बनावट असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. या पत्रात एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहे. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आता प्रकाश आंबेडकर यांनी पवारांना एल्गार परिषदेसंबंधी त्यांच्याकडे असलेली सर्व माहिती व कागदपत्रे सार्वजनिक करण्याची विनंती केली आहे. शरद पवार ही विनंती मान्य करतील अशी अपेक्षा देखील आंबेेेडकरांनी व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरु केले आहे. तसेच एल्गार परिषदेवरून केंद्र सरकार राजकारण असून या प्रकरणाचा तपास देखील चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित व्यक्तींवर नको असलेले कायदे लावण्यात आले आहे. मात्र  या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे याची माहिती लोकांना होईल.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारElgar morchaएल्गार मोर्चाPoliceपोलिसCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे