शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

‘एल्गार’चा तपास एनआयएमार्फतच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 6:31 AM

मुख्यमंत्री ठाकरेंचा निर्णय : राष्ट्रवादीचे म्हणणे अमान्य; कोरेगाव-भीमा तपास पोलिसांकडेच

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मात्र कोरेगाव-भीमा प्रकरणातील २२ गुन्ह्यांचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडेच राहील.

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एसआयटीद्वारे राज्य सरकारने करावा, असे पत्र राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित फाइलवर एसआयटी नेमण्याची शिफारस केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी ती अमान्य करून, हा तपास एनआयएकडे देण्यास संमती दिल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच सांगितले.

कोरेगाव-भीमाची दंगल हे तात्कालिक राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडविलेले षड्यंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून दिशाभूल करण्याचा तो डाव होता. त्यामुळे याची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली होती. पण केंद्राने लगेचच तपास एनआयएकडे दिला. ठाकरे यांनी केंद्राच्या निर्णयावर टीका करताना राज्य सरकारला विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा होता. तसे झाले नाही, असे म्हटले होते.

राज्य सरकारची भूमिकाराज्य सरकारने एनआयएला कागदपत्रे न दिल्याने एनआयएची टीम न्यायालयात गेली. तिथे एनआयएने एल्गार परिषदेसंबंधीची सर्व कागदपत्रे मागितली होती. संबंधित गुन्हा स्थानिक न्यायालयाच्या कक्षेत घडला असून, आरोपपत्रही दाखल झाले आहे. त्यामुळे तपास एनआयएकडे देणे योग्य व कायदेशीर होणार नाही, असे राज्य सरकारचे म्हणणे होते.

प्रश्न आता मिटला - अनिल देशमुखयामुळे शिवसेना व राष्टÑवादी या पक्षांत मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अनिल देशमुख म्हणाले, केंद्राने राज्य सरकारला विश्वासात घ्यावे, असे आमचे म्हणणे होते. मुख्यमंत्र्यांनी एनआयएला मंजुरी दिल्याने प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाNCPराष्ट्रवादी काँग्रेस