शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

अकरावी प्रवेश आता सीईटीच्या आधारावर; विद्यार्थ्यांची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 11:30 IST

दहावी निकालानंतर दोन आठवड्यांनी म्हणजेच जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते.

मुंबई : यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासावर आधारित सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही सीईटी परीक्षा ऐच्छिक असून, जे विद्यार्थी सीईटी देणार आहेत त्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

दहावी निकालानंतर दोन आठवड्यांनी म्हणजेच जुलै अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, वेळापत्रकाबाबतची स्पष्टता अद्याप देण्यात आलेली नाही. ही परीक्षा राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली घेतली जाणार असून, परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागातून ३ लाख ४७ हजार ५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातून ३ लाख २० हजार ७७९ जागा उपलब्ध होत्या. त्यातीलही ७६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. राज्यात दहावी उत्तीर्णांची संख्या १६ लाख असली तरी अकरावी प्रवेशाची क्षमता ही निश्चितच जास्त आहे. मागील वर्षी अकरावीच्या उपलब्ध जागांपैकी सुमारे ३२ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदाही अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, अशी अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली.

सर्वच मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे कटऑफ वाढणार आहेत. मुलांना चांगले गुण मिळाले की, नामवंत महाविद्यालयात प्रवेशासाठी स्पर्धा लागते, ही स्पर्धा यावेळी मोठ्या प्रमाणात होईल, असे प्राचार्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळाexamपरीक्षा