शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

राज्यात अनेक भागांत वीज कोसळून २० जणांचा मृत्यू, दुस-या दिवशीही पावसाने दिला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 06:09 IST

परतीच्या पावसाने सलग दुस-या दिवशी राज्याच्या अनेक भागांत थैमान घालून शनिवारी २० जणांचा बळी घेतला. वीज कोसळून मराठवाड्यात दहा जणांना जीव गेला.

मुंबई : परतीच्या पावसाने सलग दुस-या दिवशी राज्याच्या अनेक भागांत थैमान घालून शनिवारी २० जणांचा बळी घेतला. वीज कोसळून मराठवाड्यात दहा जणांना जीव गेला. नगरमध्ये ३, विदर्भात २, रायगड व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी २, तर सातारा जिल्ह्यामध्ये एक जण मृत्युमुखी पडला. येत्या २४ तासांत राज्याच्या बहुतांशी भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आजही जोरदार पाऊस कोसळत असताना कडाडणाºया विजांमुळे अंगाचा थरकाप होत होता. मुंबई शहर व उपनगरात पावसामुळे चाकरमान्यांचे घरी जाताना खूप हाल झाले.रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर होता. महाडजवळ किन्हेरी परिसरात वीज अंगावर कोसळून प्रफुल उमेश कदम (३६ , रा. अंबवडे) व दिलीप शंकर साळवी (३८ रा. कुर्ला) हे दोघे मृत्युमुखी पडले.बीडमध्ये धारूर तालुक्यात चारदरी येथे झाडाखाली थांबलेल्या दहा जणांच्या अंगावर वीज कोसळली. त्यातील पाच जण जागीच ठार झाले असून, पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजलगाव तालुक्यातील लोणगाव शिवारात राधाबाई दामोदर कोळसे (५५) मृत्युमुखी पडल्या.औरंगाबाद जिल्ह्यात ढाकेफळ (ता. पैठण) परिसरातील येळगंगा नदीच्या पुलावरून जात असताना, रामेश्वर दशरथ शेरे या कामगाराचा वीज पडून मृत्यू झाला. जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथे संदीप कचरू सोनवणे हा २२ वर्षीच्या तरुणाचाही विजेने बळी घेतला.पैठण तालुक्यातील रहाटगाव शिवारात झाडाखाली थांबलेल्या यशोदा संदीप फासाटे यांचा वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या सत्यभामा आप्पासाहेब फासाटे अत्यवस्थ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जालना जिल्ह्यात धोपटेश्वर गावात शेतात काम करत असलेल्या चंद्रभागा विष्णू दाभाडे यांचा मृत्यू झाला.मध्य महाराष्ट्रालाही पावसाने झोडपले. नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे शेतात काम करणाºया कडूबाई उर्फ लता संजय पवार वीज पडून मृत्युमुखी पडल्या, तर १२ महिला जखमी झाल्या़ या जिल्ह्यात आणखी दोघे वीज पडून मरण पावले. सातारा जिल्ह्यात कणूर (ता. वाई) येथील बबन राजपुरे यांचाही वीज पडून बळी गेला.विदर्भात नागपूरसह भंडारा, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. डोणगाव येथे गणेश शंकर पळसकर (३८) यांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. भंडाºयात एकजण दगावला.यांना बसला तडाखामुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, रायगड,मध्य महाराष्ट्रात नगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, तसेच मराठवाड्यात औरंगाबादसह बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि विदर्भात नागपूरसह अनेक जिल्ह्यांत परतीचा पाऊस कोसळला.आजही मुसळधार?येत्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र