शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सामान्यांची निवडणूक केवळ बोटावरच्या शाईपुरतीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 04:19 IST

नवमतदारांचे मत : शिक्षणाचा बाजार, शेतकरी आत्महत्या, रोजगाराचा प्रश्न आ वासून उभे

मुंबई : निवडणुकीत सामान्य मतदारांच्या हातात काहीच येत नाही. फक्त बोटावर शाई दिसते... ही प्रतिक्रिया आहे एका नवमतदार विद्यार्थ्यांची. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना ‘लोकमत’ने विद्यार्थी, नवमतदार यांच्या मनातील मुद्द्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यात एका विद्यार्थ्यांने अशी मार्मिक टिपण्णी केली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वसामान्य भेडसावणारे प्रश्न, रोजगाराची समस्या यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. अवांतर विषयांचीच चर्चा जास्त होत आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या वर्तुळात आहे. राजकीय नेते आणि विधानसभेच्या उमेदवारांकडून तीच-तीच आश्वासने, घोषणा सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. निवडणूक महाराष्ट्रात असल्याने महाराष्ट्रातील विषय प्रचारामध्ये मांडले जाणे अपेक्षित आहे, असे मत नवमतदार विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, शिक्षणाचे खासगीकरण, रोजगाराचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या असे अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे आ वासून उभे आहेत, परंतु कोणताही राजकीय नेता यावर भाष्य करत नाही. वादग्रस्त वक्तव्य, शेरेबाजी, टोलवाटोलवी, आरोप-प्रत्यारोप करून निवडणुका जिंकल्या जातात.ज्या सरकारकडून काहीतरी नवीन बदल घडेल, अशी अपेक्षा होती. त्यांनीदेखील पूर्वीच्या सरकारच्या पावलांवर पाऊल ठेवले. ज्या सरकारने सांगितले की, भ्रष्टाचारी राजकर्त्यांना जेलमध्ये टाकू, पण त्यांनी अशा उमेदवारांना त्यांच्याच पक्षात घेऊन उमेदवारी दिली. यंदाच्या निवडणुकीत मत कोणाला करायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. राज्यघटनेने सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा अधिकार दिला आहे. शिक्षणाचा बाजार मांडून विद्यार्थ्यांची, पालकांची लूट केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणताही नेता बोलत नाही. काहींना ईडीची भीती वाटत असेल, त्यामुळे मूग गिळून गप्प बसले असतील, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठातील मराठी विभागात शिकणारा परेश जाधव याने दिली.

काही नेते पक्ष सोडून जिथे सत्ता आहे तिथे गेले. अशा नेत्यांची स्वार्थीवृत्ती यातूनच दिसून येते. असे उमेदवार निवडून आले, तर त्यांच्याकडून कोणत्या प्रकाराची लोकसेवेची कामे होतील, यात शंका आहे. प्रचारातील मुद्दे, घोषणा ऐकून कीव येत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठातील मराठी विभागात शिकणारी श्रेया पांचाळ हिने दिली.फक्त ‘मन की बात’ म्हणत मतदारांची दिशाभूलसध्या महाराष्ट्रात ज्या प्रचारसभा चालू आहेत, त्यामध्ये ३७०, राफेल, राममंदिर यासारख्या भावनिक मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात आपले राजकीय नेते बोलताना दिसतात. विधानसभा निवडणूक ही राज्यातील स्थानिक प्रश्नांवर लढवायची असते. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, आर्थिक मंदी, शिक्षणाचे खासगीकरण यावर कोणीही बोलत नाही. राज्याच्या हिताची एकही गोष्ट राजकीय नेते करत नाहीत. फक्त मन की बात म्हणत मतदारांची दिशाभूल केली जाते, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठातील मराठी विभागात शिकणारा तुषार मांडवकर याने दिली.

टॅग्स :MumbaiमुंबईAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019