शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

सोलापुरात पोटनिवडणुकीचा धुरळा,  तर साताऱ्यात बेजबाबदारपणा नडतोय, ४० दिवसांत वाढले ५५ हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 08:18 IST

सोलापूर शहरानंतर बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात रुग्णवाढ सुरू झाली. दरम्यान, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली.

राजकुमार सारोळे - सोलापूर: २५ दिवसांच्या संचारबंदीनंतरही सोलापूर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम आहे. गेल्या ४० दिवसांत ५५ हजार ६२९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, १ हजार २३५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एप्रिल व मेमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आणि मृत्यू झाले आहेत. पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० मध्ये १५ हजार ३०९ रुग्ण आढळले होते. नवीन वर्षात एप्रिलमध्ये ३६ हजार २३६ रुग्ण तर ७४० जणांचा मृत्यू झाला. १० मेपर्यंत दहा दिवसांत १९ हजार ३८४ पॉझिटिव्ह तर ४९५ जणांचा मृत्यू झाला. मेमध्ये शहरातील रुग्ण कमी झाले आहेत; पण ग्रामीण भागातील लाट कायम आहे. ग्रामीणमध्ये दररोज सरासरी दोन हजार पॉझिटिव्ह व ४० जणांचा मृत्यू तर शहरात १८० पॉझिटिव्ह व १० जणांचा मृत्यू अशी स्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने १५ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन जाहीर केला असून तो १५ मेपर्यंत वाढविला आहे.पोटनिवडणुकीनंतर संसर्गसोलापूर शहरानंतर बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात रुग्णवाढ सुरू झाली. दरम्यान, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे या तालुक्यांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. राजकीय बैठका, नेत्यांचे दौरे, सभा यामुळे मंगळवेढा, पंढरपूर व बाजूच्या तालुक्यात संसर्ग वाढला. निवडणुकीनंतर या तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा या तालुक्यांत शेजारच्या जिल्ह्यातून लोक आल्याने संसर्ग वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग कडक लॉकडाऊननंतरही कमी व्हायचे नाव घेत नाही. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीमुळे जो धुराळा उडाला त्याची बाधा सोलापूरकरांना झाली आहे. तर अपुरी यंत्रणा असतानाही प्रशासन जीव तोडून काम करीत असतानाही सातारकरांचा बेजबाबदारपणा नडतोय, असे चित्र आहे.

ग्रामीण भागात एप्रिल व मे महिन्यात काेरोनाचा संसर्ग वाढला,  पुणे, मुंबई व कर्नाटकातून आलेल्या लोकांमुळे सीमावर्ती तालुक्यात संसर्ग वेगाने पसरला. त्यानंतर पोटनिवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय बैठकांमुळे ही वाढ झाल्याचे दिसत आहे. - डाॅ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, साेलापूर 

सातारा जिल्ह्यात प्रशासन विविध पातळ्यांवर कोरोनाचा सामना करत आहे; पण नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची खरी आवश्यकता आहे. शासन नियमांचे पालन करावे. तसेच गृहविलगीकरणातील बाधितांनी पूर्ण बरे होईपर्यंत बाहेर पडू नये.- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSolapurसोलापूरElectionनिवडणूकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरOxygen Cylinderऑक्सिजनState Governmentराज्य सरकार