शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

सोलापुरात पोटनिवडणुकीचा धुरळा,  तर साताऱ्यात बेजबाबदारपणा नडतोय, ४० दिवसांत वाढले ५५ हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 08:18 IST

सोलापूर शहरानंतर बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात रुग्णवाढ सुरू झाली. दरम्यान, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली.

राजकुमार सारोळे - सोलापूर: २५ दिवसांच्या संचारबंदीनंतरही सोलापूर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम आहे. गेल्या ४० दिवसांत ५५ हजार ६२९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, १ हजार २३५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एप्रिल व मेमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आणि मृत्यू झाले आहेत. पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० मध्ये १५ हजार ३०९ रुग्ण आढळले होते. नवीन वर्षात एप्रिलमध्ये ३६ हजार २३६ रुग्ण तर ७४० जणांचा मृत्यू झाला. १० मेपर्यंत दहा दिवसांत १९ हजार ३८४ पॉझिटिव्ह तर ४९५ जणांचा मृत्यू झाला. मेमध्ये शहरातील रुग्ण कमी झाले आहेत; पण ग्रामीण भागातील लाट कायम आहे. ग्रामीणमध्ये दररोज सरासरी दोन हजार पॉझिटिव्ह व ४० जणांचा मृत्यू तर शहरात १८० पॉझिटिव्ह व १० जणांचा मृत्यू अशी स्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने १५ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन जाहीर केला असून तो १५ मेपर्यंत वाढविला आहे.पोटनिवडणुकीनंतर संसर्गसोलापूर शहरानंतर बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात रुग्णवाढ सुरू झाली. दरम्यान, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे या तालुक्यांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. राजकीय बैठका, नेत्यांचे दौरे, सभा यामुळे मंगळवेढा, पंढरपूर व बाजूच्या तालुक्यात संसर्ग वाढला. निवडणुकीनंतर या तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा या तालुक्यांत शेजारच्या जिल्ह्यातून लोक आल्याने संसर्ग वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग कडक लॉकडाऊननंतरही कमी व्हायचे नाव घेत नाही. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीमुळे जो धुराळा उडाला त्याची बाधा सोलापूरकरांना झाली आहे. तर अपुरी यंत्रणा असतानाही प्रशासन जीव तोडून काम करीत असतानाही सातारकरांचा बेजबाबदारपणा नडतोय, असे चित्र आहे.

ग्रामीण भागात एप्रिल व मे महिन्यात काेरोनाचा संसर्ग वाढला,  पुणे, मुंबई व कर्नाटकातून आलेल्या लोकांमुळे सीमावर्ती तालुक्यात संसर्ग वेगाने पसरला. त्यानंतर पोटनिवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय बैठकांमुळे ही वाढ झाल्याचे दिसत आहे. - डाॅ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, साेलापूर 

सातारा जिल्ह्यात प्रशासन विविध पातळ्यांवर कोरोनाचा सामना करत आहे; पण नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची खरी आवश्यकता आहे. शासन नियमांचे पालन करावे. तसेच गृहविलगीकरणातील बाधितांनी पूर्ण बरे होईपर्यंत बाहेर पडू नये.- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSolapurसोलापूरElectionनिवडणूकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरOxygen Cylinderऑक्सिजनState Governmentराज्य सरकार