शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

सोलापुरात पोटनिवडणुकीचा धुरळा,  तर साताऱ्यात बेजबाबदारपणा नडतोय, ४० दिवसांत वाढले ५५ हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 08:18 IST

सोलापूर शहरानंतर बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात रुग्णवाढ सुरू झाली. दरम्यान, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली.

राजकुमार सारोळे - सोलापूर: २५ दिवसांच्या संचारबंदीनंतरही सोलापूर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम आहे. गेल्या ४० दिवसांत ५५ हजार ६२९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, १ हजार २३५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एप्रिल व मेमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आणि मृत्यू झाले आहेत. पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० मध्ये १५ हजार ३०९ रुग्ण आढळले होते. नवीन वर्षात एप्रिलमध्ये ३६ हजार २३६ रुग्ण तर ७४० जणांचा मृत्यू झाला. १० मेपर्यंत दहा दिवसांत १९ हजार ३८४ पॉझिटिव्ह तर ४९५ जणांचा मृत्यू झाला. मेमध्ये शहरातील रुग्ण कमी झाले आहेत; पण ग्रामीण भागातील लाट कायम आहे. ग्रामीणमध्ये दररोज सरासरी दोन हजार पॉझिटिव्ह व ४० जणांचा मृत्यू तर शहरात १८० पॉझिटिव्ह व १० जणांचा मृत्यू अशी स्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने १५ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन जाहीर केला असून तो १५ मेपर्यंत वाढविला आहे.पोटनिवडणुकीनंतर संसर्गसोलापूर शहरानंतर बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात रुग्णवाढ सुरू झाली. दरम्यान, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यामुळे या तालुक्यांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. राजकीय बैठका, नेत्यांचे दौरे, सभा यामुळे मंगळवेढा, पंढरपूर व बाजूच्या तालुक्यात संसर्ग वाढला. निवडणुकीनंतर या तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा या तालुक्यांत शेजारच्या जिल्ह्यातून लोक आल्याने संसर्ग वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग कडक लॉकडाऊननंतरही कमी व्हायचे नाव घेत नाही. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीमुळे जो धुराळा उडाला त्याची बाधा सोलापूरकरांना झाली आहे. तर अपुरी यंत्रणा असतानाही प्रशासन जीव तोडून काम करीत असतानाही सातारकरांचा बेजबाबदारपणा नडतोय, असे चित्र आहे.

ग्रामीण भागात एप्रिल व मे महिन्यात काेरोनाचा संसर्ग वाढला,  पुणे, मुंबई व कर्नाटकातून आलेल्या लोकांमुळे सीमावर्ती तालुक्यात संसर्ग वेगाने पसरला. त्यानंतर पोटनिवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय बैठकांमुळे ही वाढ झाल्याचे दिसत आहे. - डाॅ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, साेलापूर 

सातारा जिल्ह्यात प्रशासन विविध पातळ्यांवर कोरोनाचा सामना करत आहे; पण नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची खरी आवश्यकता आहे. शासन नियमांचे पालन करावे. तसेच गृहविलगीकरणातील बाधितांनी पूर्ण बरे होईपर्यंत बाहेर पडू नये.- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSolapurसोलापूरElectionनिवडणूकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरOxygen Cylinderऑक्सिजनState Governmentराज्य सरकार