शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणूक?; भाजपा करतंय सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 10:08 IST

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला मिळाले अधिक बळ

मुंबई : लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होणार, अशी चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आणि आणखी काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात असल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी किमान ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपप्रणीत महायुतीने समोर ठेवले आहे. अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे बडे नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले तर अर्थातच मोठा फायदा होईल. चव्हाण यांच्यासोबत येत्या दोन-चार दिवसांमध्ये काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये जातील असे म्हटले जात आहे. त्या परिस्थितीत या आमदारांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. 

आणखी किती आमदार ?चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदार राजीनामे देऊन काँग्रेसबाहेर पडतील. ही संख्या १४ पर्यंत असू शकते असे म्हटले जाते. त्यांनी आमदारकी सोडली तर विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडे पद नसेल, निधी मिळणार नाही. असे असूनही काही आमदारांनी लगेच काँग्रेस सोडली तर लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रच होण्याची शक्यता वाढेल.

सर्वेक्षण सुरू सूत्रांनी सांगितले, की लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्यास काय आणि वेगळी घेतल्यास काय चित्र असेल या बाबतची सर्वेक्षणे खासगी कंपन्यांकडून केली जात आहेत. याची चाचपणी भाजपश्रेष्ठींकडून केली जात आहे.   

...तर खर्च वाढणार महाविकास आघाडी सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर खर्चाचा आकडा वाढेल. दोन्हींचा खर्च करणे महायुतीच्या तुलनेने महाविकास आघाडीला कठीण जाईल. मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही करून घ्यायचा, असा विचार भाजपमध्ये सुरू आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेची गणिते वेगवेगळी आहेत. लोकसभेसाठी जेवढी पसंती भाजप, मोदी यांना आहे तेवढी विधानसभा निवडणुकीसाठी नसेल असे म्हटले जाते. त्यामुळेच चाळीसपेक्षा अधिक जागा या लोकप्रियतेच्या आधारे निवडून आणाव्यात आणि सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे घ्यावी, असाही एक सूर दिल्लीतील भाजपच्या वर्तुळात आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक