शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 16:47 IST

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात नक्की कोणाला किती जागा मिळणार, याबाबत साशंकता होती.

अक्षय शितोळे

Maharashtra Lok Sabha ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन अनेक आठवडे उलटल्यानंतरही महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतीलही जागावाटपांचं समीकरण निश्चित झालं नव्हतं. मात्र आता मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी हे जागावाटपाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून महायुतीकडूनही पालघरची जागा वगळता अन्य सर्व ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपसोबत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन नवे पक्ष महायुतीत सामील झाले आहेत. त्यामुळे जागावाटपात नक्की कोणाला किती जागा मिळणार, याबाबत साशंकता होती. शिंदेंच्या शिवसेनेला दोन अंकी जागा मिळवण्यात अपयश येईल, असा अंदाजही सुरुवातीच्या काळात वर्तवला जात होता. मात्र महायुतीच्या जागावाटपात तब्बल १५ जागा आपल्याकडे खेचण्यात शिंदेंना यश आल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे, अजित पवारांच्या पदरी काहीशी निराशा आल्याचं स्पष्ट झालं आहे.

"मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ज्या चार जागांवर विजय मिळवला होता, त्या बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या चार जागा तर आपल्याला मिळतीलच. पण त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिथे खासदार आहेत त्यातल्याही काही जागा आपल्याला मिळतील," असा दावा अजित पवारांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी केला होता. मात्र प्रत्यक्षात महायुतीचे जागावाटप झाल्यानंतर अजित पवारांना साताऱ्याची जागा भाजपला सोडावी लागली. तसंच परभणीची जागा रासपच्या महादेव जानकर यांना द्यावी लागली. सोबतच अजित पवारांच्या पक्षाकडून माढा आणि नाशिकच्या जागेवरही दावा सांगितला गेला होता. मात्र या दोन जागाही त्यांना मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे महायुतीच्या तहात अजित पवार फसले आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अजित पवारांची काय आहे भूमिका?

महायुतीच्या जागावाटपाच्या तहात हरल्याचे आरोप फेटाळून लावत अजित पवार यांनी नुकतीच 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४८ पैकी ४१ जागा एनडीएने जिंकल्या होत्या. उरलेल्या सात जागांपैकी चार जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला होता. आम्ही मागच्या वेळी जिंकलेली साताऱ्याची जागा आम्हाला यावेळी सोडावी लागली. कारण छत्रपतींच्या ज्या दोन गाद्या आहेत, त्यातील कोल्हापूरची गादी सध्या महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे दुसऱ्या गादीला साथ दिली नाही, असं चित्र तयार व्हायला नको, म्हणून आमच्या पक्षाच्या पार्लामेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला. साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात आम्हाला राज्यसभेची एक जागा मिळणार आहे. परभणीची जागाही आमच्या वाट्याला आली होती. मात्र राजकारणात सोशल इंजिनिअरिंग गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही ती जागा रासपच्या महादेव जानकर यांना सोडली," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीत कोणत्या १५ जागा मिळाल्या?

रामटेक बुलढाणा यवतमाळ वाशीम हिंगोली कोल्हापूर हातकणंगलेसंभाजीनगर मावळ शिर्डी नाशिक कल्याण ठाणे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीच्या जागावाटपात मिळालेल्या जागा

बारामतीशिरूररायगड धाराशिव

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा