शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 16:47 IST

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात नक्की कोणाला किती जागा मिळणार, याबाबत साशंकता होती.

अक्षय शितोळे

Maharashtra Lok Sabha ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन अनेक आठवडे उलटल्यानंतरही महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतीलही जागावाटपांचं समीकरण निश्चित झालं नव्हतं. मात्र आता मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी हे जागावाटपाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून महायुतीकडूनही पालघरची जागा वगळता अन्य सर्व ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपसोबत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन नवे पक्ष महायुतीत सामील झाले आहेत. त्यामुळे जागावाटपात नक्की कोणाला किती जागा मिळणार, याबाबत साशंकता होती. शिंदेंच्या शिवसेनेला दोन अंकी जागा मिळवण्यात अपयश येईल, असा अंदाजही सुरुवातीच्या काळात वर्तवला जात होता. मात्र महायुतीच्या जागावाटपात तब्बल १५ जागा आपल्याकडे खेचण्यात शिंदेंना यश आल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे, अजित पवारांच्या पदरी काहीशी निराशा आल्याचं स्पष्ट झालं आहे.

"मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ज्या चार जागांवर विजय मिळवला होता, त्या बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या चार जागा तर आपल्याला मिळतीलच. पण त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिथे खासदार आहेत त्यातल्याही काही जागा आपल्याला मिळतील," असा दावा अजित पवारांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी केला होता. मात्र प्रत्यक्षात महायुतीचे जागावाटप झाल्यानंतर अजित पवारांना साताऱ्याची जागा भाजपला सोडावी लागली. तसंच परभणीची जागा रासपच्या महादेव जानकर यांना द्यावी लागली. सोबतच अजित पवारांच्या पक्षाकडून माढा आणि नाशिकच्या जागेवरही दावा सांगितला गेला होता. मात्र या दोन जागाही त्यांना मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे महायुतीच्या तहात अजित पवार फसले आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अजित पवारांची काय आहे भूमिका?

महायुतीच्या जागावाटपाच्या तहात हरल्याचे आरोप फेटाळून लावत अजित पवार यांनी नुकतीच 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४८ पैकी ४१ जागा एनडीएने जिंकल्या होत्या. उरलेल्या सात जागांपैकी चार जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला होता. आम्ही मागच्या वेळी जिंकलेली साताऱ्याची जागा आम्हाला यावेळी सोडावी लागली. कारण छत्रपतींच्या ज्या दोन गाद्या आहेत, त्यातील कोल्हापूरची गादी सध्या महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे दुसऱ्या गादीला साथ दिली नाही, असं चित्र तयार व्हायला नको, म्हणून आमच्या पक्षाच्या पार्लामेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला. साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात आम्हाला राज्यसभेची एक जागा मिळणार आहे. परभणीची जागाही आमच्या वाट्याला आली होती. मात्र राजकारणात सोशल इंजिनिअरिंग गरजेचं असतं. त्यामुळे आम्ही ती जागा रासपच्या महादेव जानकर यांना सोडली," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीत कोणत्या १५ जागा मिळाल्या?

रामटेक बुलढाणा यवतमाळ वाशीम हिंगोली कोल्हापूर हातकणंगलेसंभाजीनगर मावळ शिर्डी नाशिक कल्याण ठाणे मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीच्या जागावाटपात मिळालेल्या जागा

बारामतीशिरूररायगड धाराशिव

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा