शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:43 IST

१० व्या परिशिष्टानुसार विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यायचा असतो म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांच्याकडे हे प्रकरण पाठवले होते असं त्यांनी सांगितले. 

मुंबई - एकनाथ शिंदे याआधी इतक्यांदा दिल्लीत गेलेले दिसले नाही. बहुमताच्या जोरावर शांतपणे सत्ता उपभोगत होते. मात्र कोर्टातील काही सूत्रांकडून त्यांना सुनावणीचा निकाल आपल्याविरोधात येणार आहे असं कळले असेल. मग त्यापुढची रणनीती काय असेल, एकनाथ शिंदे यांनी भाजपात जायचे का, मग भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांनाच घेणार आहे असं नाही. त्यामुळे शिंदेसोबत असलेल्यांना कायमचे राजकीय अनाथपण येणार आहे असा दावा कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. 

असीम सरोदे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल दिल्यानंतर पुढची रणनीती काय असेल हे ठरवावे लागणार आहे. निकालाची वेळ थोडी टळली आहे परंतु ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोण कुणासोबत जाणार, आपण कुणाला घेणार, मग त्यांच्याकडे अधिकार काय असणार हे ठरवले जात आहे. न्या. चंद्रचूड यांनी जो निर्णय दिला, त्यात राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. बहुमत चाचणी बोलवली नाही. विधानसभा अध्यक्षांच्या वागणुकीवर निकालात भाष्य आहे. या निर्णयापूर्वी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना नाव वापरण्याची परवानगी दिली. आता सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय आणि पक्ष, चिन्हाबाबत सुनावणी एकत्रित घेतली जाणार आहे. त्यातून एक स्पष्टताच येणार आहे. १० व्या परिशिष्टानुसार विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यायचा असतो म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांच्याकडे हे प्रकरण पाठवले होते असं त्यांनी सांगितले. 

तर सहा महिने सुनावणी केल्यानंतर पक्षांतर आणि अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायला सांगितला होता. मग राहुल नार्वेकरांनी या प्रकरणावर निर्णय देताना कुणीच अपात्र नाही असा निर्णय घेतला. हा पक्षातंर्गत वादाचा मुद्दा आहे असं त्यांनी म्हटलं. मग पक्षातंर्गत वादाचा मुद्दा असताना राहुल नार्वेकरांना यावर निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. नार्वेकरांनी याबाबत सुप्रीम कोर्टाला प्रथमदर्शनी हा पक्षातंर्गत वादाचा मुद्दा आहे असं सांगून फाईल परत पाठवायला हवी होती. या चुका विश्लेषणाच्या पातळीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस येतील तेव्हा राजकीय समीकरण बदलणार आणि संविधानिक हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे असंही असीम सरोदे यांनी दावा केला. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, जो सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल त्यातून संविधानाचा विजय होईल. कारण असे प्रकार देशात चालणार की नाही हे निकालातून स्पष्टता येईल. निवडणूक कोणाकडूनही लढवा, निकालानंतर राजकीय बेरीज मांडली जाईल, त्यांना पैसे देऊ, पक्ष फोडू हा जो असंविधानिक अट्टाहास आहे. त्यामुळे अशा प्रकारे पक्षफोडी, पक्षांतरे चालणार का, जे पक्षातून गेले त्यांनाच मूळ पक्ष तुमचा असल्याचं निवडणूक आयोगाचा निकाल हे चालणार का यासारख्या गोष्टींमुळे सुप्रीम कोर्टाला निकाल महत्त्वाचा आहे. पक्षांतर बंदीत १० व्या परिशिष्टाचे महत्त्व नसेल तर ते घटनेतून काढायला हवे आणि कायदा अस्तित्वात असेल आणि संविधानात असेल तर त्याचे पालन झाले पाहिजे असंही असीम सरोदे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAsim Sarodeअसिम सराेदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा