शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:43 IST

१० व्या परिशिष्टानुसार विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यायचा असतो म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांच्याकडे हे प्रकरण पाठवले होते असं त्यांनी सांगितले. 

मुंबई - एकनाथ शिंदे याआधी इतक्यांदा दिल्लीत गेलेले दिसले नाही. बहुमताच्या जोरावर शांतपणे सत्ता उपभोगत होते. मात्र कोर्टातील काही सूत्रांकडून त्यांना सुनावणीचा निकाल आपल्याविरोधात येणार आहे असं कळले असेल. मग त्यापुढची रणनीती काय असेल, एकनाथ शिंदे यांनी भाजपात जायचे का, मग भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांनाच घेणार आहे असं नाही. त्यामुळे शिंदेसोबत असलेल्यांना कायमचे राजकीय अनाथपण येणार आहे असा दावा कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. 

असीम सरोदे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल दिल्यानंतर पुढची रणनीती काय असेल हे ठरवावे लागणार आहे. निकालाची वेळ थोडी टळली आहे परंतु ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोण कुणासोबत जाणार, आपण कुणाला घेणार, मग त्यांच्याकडे अधिकार काय असणार हे ठरवले जात आहे. न्या. चंद्रचूड यांनी जो निर्णय दिला, त्यात राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते. बहुमत चाचणी बोलवली नाही. विधानसभा अध्यक्षांच्या वागणुकीवर निकालात भाष्य आहे. या निर्णयापूर्वी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना नाव वापरण्याची परवानगी दिली. आता सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय आणि पक्ष, चिन्हाबाबत सुनावणी एकत्रित घेतली जाणार आहे. त्यातून एक स्पष्टताच येणार आहे. १० व्या परिशिष्टानुसार विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय घ्यायचा असतो म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यांच्याकडे हे प्रकरण पाठवले होते असं त्यांनी सांगितले. 

तर सहा महिने सुनावणी केल्यानंतर पक्षांतर आणि अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायला सांगितला होता. मग राहुल नार्वेकरांनी या प्रकरणावर निर्णय देताना कुणीच अपात्र नाही असा निर्णय घेतला. हा पक्षातंर्गत वादाचा मुद्दा आहे असं त्यांनी म्हटलं. मग पक्षातंर्गत वादाचा मुद्दा असताना राहुल नार्वेकरांना यावर निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. नार्वेकरांनी याबाबत सुप्रीम कोर्टाला प्रथमदर्शनी हा पक्षातंर्गत वादाचा मुद्दा आहे असं सांगून फाईल परत पाठवायला हवी होती. या चुका विश्लेषणाच्या पातळीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस येतील तेव्हा राजकीय समीकरण बदलणार आणि संविधानिक हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे असंही असीम सरोदे यांनी दावा केला. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, जो सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल त्यातून संविधानाचा विजय होईल. कारण असे प्रकार देशात चालणार की नाही हे निकालातून स्पष्टता येईल. निवडणूक कोणाकडूनही लढवा, निकालानंतर राजकीय बेरीज मांडली जाईल, त्यांना पैसे देऊ, पक्ष फोडू हा जो असंविधानिक अट्टाहास आहे. त्यामुळे अशा प्रकारे पक्षफोडी, पक्षांतरे चालणार का, जे पक्षातून गेले त्यांनाच मूळ पक्ष तुमचा असल्याचं निवडणूक आयोगाचा निकाल हे चालणार का यासारख्या गोष्टींमुळे सुप्रीम कोर्टाला निकाल महत्त्वाचा आहे. पक्षांतर बंदीत १० व्या परिशिष्टाचे महत्त्व नसेल तर ते घटनेतून काढायला हवे आणि कायदा अस्तित्वात असेल आणि संविधानात असेल तर त्याचे पालन झाले पाहिजे असंही असीम सरोदे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAsim Sarodeअसिम सराेदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा