शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

Eknath Shinde:...म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 21:14 IST

'आम्ही गाजराचा हलवा दिला, तुम्ही फक्त गाजर दाखवत बसला.'

खेड: काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडली आणि दोन गट तयार झाले. एकीकडे उद्धव ठाकरे गट तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेतली. यावेळी त्यांनी आपली गोळीबारवरुन तुफान फायरिंग केली.

यावेळी बोलताना एकनाध शिंदे म्हणाले की, ते लोक आज आपली सभा पाहत असतील. पूर्वी झालेल्या सभेची गर्दी आणि आजच्या सभेची गर्दी दिसत आहे. याच मैदानात बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली होती. काही दिवसांपूर्वीच याच गोळीबार मैदानात फुसका बार येऊन गेला. मी त्यांना उत्तर द्यायला आलो नाही. उत्तर आरोप किंवा टीकेला द्यायचे असते. परंतू, तोच-तोच थयथयाट...तिच तिच आदळ आपट, याला काय उत्तर देणार. 

मी राज्यभर फिरणारा मुख्यमंत्रीमला वर्षावर राज्यातील सोन्यासारखी माणसं भेटतात, त्यांना एक कप चहा पाजू शकत नाही का? त्याचाही तुम्ही हिशोब काढता. कोरोना काळात वर्षा बंद होता.आज वर्षा सर्वांसाठी खुला आहे. मी मुख्यमंत्री होईल, हे मला वाटलं नव्हतं. पण, माझ्या पाठिशी सगळे आले, म्हणूनच नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी मला मुख्यमंत्री केलं. देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केलं. मी फिरणारा मुख्यमंत्री आहे, घरात बसणारा नाही. मी लोकांमध्ये जातो, मला त्यांना भेटायला आवडते.

...म्हणून दिल्लीवारी करतोते पुढे म्हणाले, मी वारंवार दिल्लीला जातो, म्हणून माझ्यावर टीका करतात. माझ्या दिल्लीला जाणाचे कारण म्हणजे, मी तिकडून मोठ-मोठे प्रकल्प आणतो. मी दिल्लीवरुन राज्यासाठी पैसा आणतो. मी दिल्लीला जातो आणि राज्यातील तरुणांसाठी रोजगार आणतो. मागे डावोसला गेलो आणि तिकडून मोठे प्रकल्प आणले. राज्यासाठी केंद्रातून हजारो-लाखो रुपयांचे प्रकल्प आमच्या सरकारने आणले. त्यासाठी मी वारंवार दिल्लीला जातो आणि यापुढेही जात राहीन. माझ्यात अहंकार नाही, मी राज्यातील लोकांसाठी मी दिल्लीला जाणार. राज्यातील सरकार आता सायलेंट मोडवर नाही, अलर्ट मोडवर आहे. 

तुम्ही फक्त गाजरं दाखवत बसलात...आमच्या सरकारमध्ये एवढे निर्णय घेतले की, वाचायला एक तास लागेल. पेट्रोल-डिझेल, शेतकऱ्यांसाठीचे निर्णय, महिलांसाठी अर्धे तिकीट यांसह अनेक निर्णय घेतले. हे सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. आम्ही जो अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये सगळ्या लोकांना घेतलंय. त्यांनी आम्हाला गाजराचा हलवा म्हटले, आम्ही गाजराचा हलवा तरी दिला. तुम्ही फक्त गाजरं दाखवत बसलात. आमचा पर्सनल अजेंडा नाही, सर्वसामान्य लोकांचे आयुष्य बदलले पाहिजे, हाच आमचा अजेंडा आहे, असेही शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह