शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:15 IST

साधे गरिब फाटके लोक त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतायेत ते तुमच्या ५० खोके सरकारपुढे झुकणार नाही असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई – अजितदादा काय म्हणतायेत त्यावर काय बोलणार? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर विश्वास काय ठेवायचा. हे निष्ठेच्या आणाभाका घेऊन कशी बेईमानी करतात हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे मराठा समाजाने अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. आश्वासने देतात, खोट्या घोषणा करतात. एकाबाजूला चर्चा करतात दुसऱ्याबाजूला पोलिसांना आंदोलकांची डोकी फोडण्याचे आदेश द्यायचे. त्यानंतर काखावर करणे हे यांचे धोरण आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला टोला लगावला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, मराठा समाजाने जी भूमिका घेतली आहे, आंदोलन केले आहे. त्यापुढे सरकारने गुडघे टेकले आहेत ही चांगली गोष्ट आहे. जालनासारख्या जिल्ह्यात एका खेड्यात मनोज जरांगे पाटील सारखा कार्यकर्ता उपोषणाला बसतो. त्याच्यावर इतका दबाव येऊनही तो झुकत नाही. त्याचे कौतुक महाराष्ट्राला आहे. सरकारची वचने पोकळ आणि फसवी होती. सरकारचे आमदार, मंत्री तिथे गेले होते. आंदोलन संपले का? उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले का तर नाही. ते तुमच्या ५० खोक्यांनी विकले जाणारे लोकं नाही. फाटके लोकं आहेत. साधे गरिब फाटके लोक त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतायेत ते तुमच्या ५० खोके सरकारपुढे झुकणार नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच हरीश साळवी खूप मोठे वकील आहेत. त्यांचे लग्न झाले ही वैयक्तिक गोष्ट आहे. लंडनमध्ये त्यांनी लग्नाची पार्टी दिली त्याठिकाणी मोठमोठे व्यक्ती हजर होते. हादेखील त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुणाच्याही खासगी आयुष्यात राजकारण झाले नाही पाहिजे. परंतु त्या पार्टीत ललित मोदी आले होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणीत येथील ईडी त्यांना शोधत आहे. ललित मोदीला पळपुटा घोषित केले आहे. हरिश साळवींच्या पार्टीत ते उपस्थित होते. ते सरकारने गठीत केलेल्या वन नेशन वन इलेक्शन या समितीतील सदस्य आहे. त्यांच्या पार्टीत ललित मोदी चेअर्स करतायेत. यावर भाजपाने, अमित शाहने भाष्य करायला हवे. आता ईडी, सीबीआय काय करणार असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

दरम्यान, भाजपा आणि सरकारमध्ये जर नैतिकता शिल्लक असेल तर लंडनच्या पार्टीवर खुलासा करावा. वन नेशन वन इलेक्शन समितीत हरिश साळवींचा समावेश असणार का हा जनतेच्या मनातील प्रश्न आहे त्यावरही सरकारने बोलावे असं आव्हान राऊतांनी दिले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार