शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:15 IST

साधे गरिब फाटके लोक त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतायेत ते तुमच्या ५० खोके सरकारपुढे झुकणार नाही असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई – अजितदादा काय म्हणतायेत त्यावर काय बोलणार? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर विश्वास काय ठेवायचा. हे निष्ठेच्या आणाभाका घेऊन कशी बेईमानी करतात हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे मराठा समाजाने अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. आश्वासने देतात, खोट्या घोषणा करतात. एकाबाजूला चर्चा करतात दुसऱ्याबाजूला पोलिसांना आंदोलकांची डोकी फोडण्याचे आदेश द्यायचे. त्यानंतर काखावर करणे हे यांचे धोरण आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला टोला लगावला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, मराठा समाजाने जी भूमिका घेतली आहे, आंदोलन केले आहे. त्यापुढे सरकारने गुडघे टेकले आहेत ही चांगली गोष्ट आहे. जालनासारख्या जिल्ह्यात एका खेड्यात मनोज जरांगे पाटील सारखा कार्यकर्ता उपोषणाला बसतो. त्याच्यावर इतका दबाव येऊनही तो झुकत नाही. त्याचे कौतुक महाराष्ट्राला आहे. सरकारची वचने पोकळ आणि फसवी होती. सरकारचे आमदार, मंत्री तिथे गेले होते. आंदोलन संपले का? उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले का तर नाही. ते तुमच्या ५० खोक्यांनी विकले जाणारे लोकं नाही. फाटके लोकं आहेत. साधे गरिब फाटके लोक त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतायेत ते तुमच्या ५० खोके सरकारपुढे झुकणार नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच हरीश साळवी खूप मोठे वकील आहेत. त्यांचे लग्न झाले ही वैयक्तिक गोष्ट आहे. लंडनमध्ये त्यांनी लग्नाची पार्टी दिली त्याठिकाणी मोठमोठे व्यक्ती हजर होते. हादेखील त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुणाच्याही खासगी आयुष्यात राजकारण झाले नाही पाहिजे. परंतु त्या पार्टीत ललित मोदी आले होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणीत येथील ईडी त्यांना शोधत आहे. ललित मोदीला पळपुटा घोषित केले आहे. हरिश साळवींच्या पार्टीत ते उपस्थित होते. ते सरकारने गठीत केलेल्या वन नेशन वन इलेक्शन या समितीतील सदस्य आहे. त्यांच्या पार्टीत ललित मोदी चेअर्स करतायेत. यावर भाजपाने, अमित शाहने भाष्य करायला हवे. आता ईडी, सीबीआय काय करणार असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

दरम्यान, भाजपा आणि सरकारमध्ये जर नैतिकता शिल्लक असेल तर लंडनच्या पार्टीवर खुलासा करावा. वन नेशन वन इलेक्शन समितीत हरिश साळवींचा समावेश असणार का हा जनतेच्या मनातील प्रश्न आहे त्यावरही सरकारने बोलावे असं आव्हान राऊतांनी दिले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार