शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार विश्वासाचे नाहीत; संजय राऊत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:15 IST

साधे गरिब फाटके लोक त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतायेत ते तुमच्या ५० खोके सरकारपुढे झुकणार नाही असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई – अजितदादा काय म्हणतायेत त्यावर काय बोलणार? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर विश्वास काय ठेवायचा. हे निष्ठेच्या आणाभाका घेऊन कशी बेईमानी करतात हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे मराठा समाजाने अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. आश्वासने देतात, खोट्या घोषणा करतात. एकाबाजूला चर्चा करतात दुसऱ्याबाजूला पोलिसांना आंदोलकांची डोकी फोडण्याचे आदेश द्यायचे. त्यानंतर काखावर करणे हे यांचे धोरण आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला टोला लगावला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, मराठा समाजाने जी भूमिका घेतली आहे, आंदोलन केले आहे. त्यापुढे सरकारने गुडघे टेकले आहेत ही चांगली गोष्ट आहे. जालनासारख्या जिल्ह्यात एका खेड्यात मनोज जरांगे पाटील सारखा कार्यकर्ता उपोषणाला बसतो. त्याच्यावर इतका दबाव येऊनही तो झुकत नाही. त्याचे कौतुक महाराष्ट्राला आहे. सरकारची वचने पोकळ आणि फसवी होती. सरकारचे आमदार, मंत्री तिथे गेले होते. आंदोलन संपले का? उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले का तर नाही. ते तुमच्या ५० खोक्यांनी विकले जाणारे लोकं नाही. फाटके लोकं आहेत. साधे गरिब फाटके लोक त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढतायेत ते तुमच्या ५० खोके सरकारपुढे झुकणार नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच हरीश साळवी खूप मोठे वकील आहेत. त्यांचे लग्न झाले ही वैयक्तिक गोष्ट आहे. लंडनमध्ये त्यांनी लग्नाची पार्टी दिली त्याठिकाणी मोठमोठे व्यक्ती हजर होते. हादेखील त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुणाच्याही खासगी आयुष्यात राजकारण झाले नाही पाहिजे. परंतु त्या पार्टीत ललित मोदी आले होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणीत येथील ईडी त्यांना शोधत आहे. ललित मोदीला पळपुटा घोषित केले आहे. हरिश साळवींच्या पार्टीत ते उपस्थित होते. ते सरकारने गठीत केलेल्या वन नेशन वन इलेक्शन या समितीतील सदस्य आहे. त्यांच्या पार्टीत ललित मोदी चेअर्स करतायेत. यावर भाजपाने, अमित शाहने भाष्य करायला हवे. आता ईडी, सीबीआय काय करणार असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

दरम्यान, भाजपा आणि सरकारमध्ये जर नैतिकता शिल्लक असेल तर लंडनच्या पार्टीवर खुलासा करावा. वन नेशन वन इलेक्शन समितीत हरिश साळवींचा समावेश असणार का हा जनतेच्या मनातील प्रश्न आहे त्यावरही सरकारने बोलावे असं आव्हान राऊतांनी दिले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार