शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 05:03 IST

शिर्डी/कोल्हापूर : महाराष्ट्रात १० लाख कोटींची गुंतवणूक केल्याचा दावा केला जात आहे. परंतु सेमी कंडक्टर, एअरबस यासह सहा हजारांहून ...

शिर्डी/कोल्हापूर : महाराष्ट्रात १० लाख कोटींची गुंतवणूक केल्याचा दावा केला जात आहे. परंतु सेमी कंडक्टर, एअरबस यासह सहा हजारांहून अधिक उद्योग राज्याबाहेर गुजरातला गेल्याने आठ लाख नोकऱ्या गेल्या. जीएसटीने मोठे नुकसान झाले. रोजगाराची निर्मिती करण्याची कोणतीही योजना त्यांच्याकडे नाही, असा घणाघात काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी केला.

भाजप नेते सातत्याने राहुल गांधी व बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधाने बोलतात. पण, राहुल यांची बहीण म्हणून सांगू इच्छिते की, काँग्रेस आणि बाळासाहेब यांची विचारधारा वेगळी असली, तरी आम्ही शिवरायांचा सन्मान करतो. तुम्ही शिवरायांचे नाव घेता, पण त्यांचा अवमान करता, अशी कठाेर टीकाही प्रियंका यांनी शिर्डी येथील सभेत केली. 

शिर्डी येथील सभेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीतील त्यांची राज्यातील ही पहिलीच सभा होती. कोल्हापुरातही त्या प्रथमच आल्या होत्या. या सभेत खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, कुस्तीपटू बजरंग पुनिया, आमदार विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.

अपमानाविरुद्ध पेटून उठा...

जनता महागाईने पिचली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. युवक रोजगार मिळत नसल्याने त्रस्त आहे. तरीही केंद्र व राज्यात बसलेले सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही. जनतेचे जीवन सुसह्य करण्याची जबाबदार सरकारची नाही का? आपण आता हे बंद केले पाहिजे, या अपमानाच्या विरुद्ध पेटून उठले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

शिवरायांचा अवमान...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधील पुतळा भ्रष्टाचार झाल्याने पडला. शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारकाची फक्त कोनशिला ठेवली; परंतु पुढे काहीच झालेले नाही. त्यावरून शिवरायांबद्दल यांच्या मनात किती प्रेम आहे हे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.

भरघोस बहुमत द्यावे

राज्य सरकारने अडीच वर्षांत काहीही केले नाही. निवडणूक येताच लाडकी बहीणसारख्या योजनांची घोषणा केली. आमचे सरकार येताच आम्ही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपये दरमहा देणार आहोत. त्यामुळे भरघोस बहुमत द्यावे, असे आवाहनही प्रियांका यांनी केले.

महाराष्ट्र ही संतांची भूमी, या भूमीचा कट्टरतेला विरोध...

प्रियंका यांनी ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘साईबाबा की जय’, अशा घोषणा देत भाषणाला सुरुवात केली. प्रारंभी त्यांनी साईबाबांच्या समानतेच्या विचाराची आठवण करून दिली.

त्या म्हणाल्या, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीने धार्मिक कट्टरतेला सतत विरोध केला. ही भूमी सत्य, समानता व मानवता सांगते. ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ ही शिकवण तुकारामांनी या भूमीतून दिली.

जातनिहाय जनगणनेबाबत...

राहुल गांधी हे आरक्षण विरोधी आहेत, असे मोदी बोलतात. मात्र, राहुल गांधी यांनी देशभर चार हजार किलोमीटरची न्याय यात्रा केली, हे ते विसरतात. राहुल गांधी जनतेला न्याय देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा उठवण्याची व जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. माझे आव्हान आहे की, पंतप्रधानांनी जातीनिहाय जनगणना करू व आरक्षणाची मर्यादा उठवू हे जाहीर करावे. राज्यात आमचे सरकार आल्यास आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहोत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Priyanka Gandhiप्रियंका गांधीMahayutiमहायुती