शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 05:03 IST

शिर्डी/कोल्हापूर : महाराष्ट्रात १० लाख कोटींची गुंतवणूक केल्याचा दावा केला जात आहे. परंतु सेमी कंडक्टर, एअरबस यासह सहा हजारांहून ...

शिर्डी/कोल्हापूर : महाराष्ट्रात १० लाख कोटींची गुंतवणूक केल्याचा दावा केला जात आहे. परंतु सेमी कंडक्टर, एअरबस यासह सहा हजारांहून अधिक उद्योग राज्याबाहेर गुजरातला गेल्याने आठ लाख नोकऱ्या गेल्या. जीएसटीने मोठे नुकसान झाले. रोजगाराची निर्मिती करण्याची कोणतीही योजना त्यांच्याकडे नाही, असा घणाघात काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी केला.

भाजप नेते सातत्याने राहुल गांधी व बाळासाहेब ठाकरे यांच्या संबंधाने बोलतात. पण, राहुल यांची बहीण म्हणून सांगू इच्छिते की, काँग्रेस आणि बाळासाहेब यांची विचारधारा वेगळी असली, तरी आम्ही शिवरायांचा सन्मान करतो. तुम्ही शिवरायांचे नाव घेता, पण त्यांचा अवमान करता, अशी कठाेर टीकाही प्रियंका यांनी शिर्डी येथील सभेत केली. 

शिर्डी येथील सभेला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीतील त्यांची राज्यातील ही पहिलीच सभा होती. कोल्हापुरातही त्या प्रथमच आल्या होत्या. या सभेत खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, कुस्तीपटू बजरंग पुनिया, आमदार विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.

अपमानाविरुद्ध पेटून उठा...

जनता महागाईने पिचली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. युवक रोजगार मिळत नसल्याने त्रस्त आहे. तरीही केंद्र व राज्यात बसलेले सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही. जनतेचे जीवन सुसह्य करण्याची जबाबदार सरकारची नाही का? आपण आता हे बंद केले पाहिजे, या अपमानाच्या विरुद्ध पेटून उठले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

शिवरायांचा अवमान...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधील पुतळा भ्रष्टाचार झाल्याने पडला. शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारकाची फक्त कोनशिला ठेवली; परंतु पुढे काहीच झालेले नाही. त्यावरून शिवरायांबद्दल यांच्या मनात किती प्रेम आहे हे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.

भरघोस बहुमत द्यावे

राज्य सरकारने अडीच वर्षांत काहीही केले नाही. निवडणूक येताच लाडकी बहीणसारख्या योजनांची घोषणा केली. आमचे सरकार येताच आम्ही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपये दरमहा देणार आहोत. त्यामुळे भरघोस बहुमत द्यावे, असे आवाहनही प्रियांका यांनी केले.

महाराष्ट्र ही संतांची भूमी, या भूमीचा कट्टरतेला विरोध...

प्रियंका यांनी ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘साईबाबा की जय’, अशा घोषणा देत भाषणाला सुरुवात केली. प्रारंभी त्यांनी साईबाबांच्या समानतेच्या विचाराची आठवण करून दिली.

त्या म्हणाल्या, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीने धार्मिक कट्टरतेला सतत विरोध केला. ही भूमी सत्य, समानता व मानवता सांगते. ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ ही शिकवण तुकारामांनी या भूमीतून दिली.

जातनिहाय जनगणनेबाबत...

राहुल गांधी हे आरक्षण विरोधी आहेत, असे मोदी बोलतात. मात्र, राहुल गांधी यांनी देशभर चार हजार किलोमीटरची न्याय यात्रा केली, हे ते विसरतात. राहुल गांधी जनतेला न्याय देण्यासाठी आरक्षणाची मर्यादा उठवण्याची व जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. माझे आव्हान आहे की, पंतप्रधानांनी जातीनिहाय जनगणना करू व आरक्षणाची मर्यादा उठवू हे जाहीर करावे. राज्यात आमचे सरकार आल्यास आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहोत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Priyanka Gandhiप्रियंका गांधीMahayutiमहायुती