शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचे अधिकारी 'ईडी' सरकारला आहेत का?- राष्ट्रवादीचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 13:30 IST

राज्यात सुरू असलेले राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नसल्याचेही मांडले मत

NCP vs Eknath Shinde Devendra Fadnavis: "ईडी सरकारबद्दल (एकनाथ (E) आणि देवेंद्र (D)) संविधानिक प्रश्न उपस्थित असताना मागच्या ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय किंवा त्यांनी केलेल्या शिफारशी रद्द करण्याचा अधिकार या सरकारला आहे का?", असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. "महाराष्ट्रातल्या 'ईडी' सरकारची संविधानिक वैधता अजूनही सिध्द व्हायची आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील ठाकरे सरकारमधील शिफारस केलेल्या विधान परिषदेच्या १२ नावाच्या आमदारांची यादी रद्द करण्यात यावी असे पत्र राज्यपालांना दिले आहे. असे अधिकार या सरकारकडे आहेत का?", असा रोखठोक सवाल महेश तपासे यांनी उपस्थित करत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी पाठविलेली १२ नावांची यादी अखेर राज्यपालांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती. राजभवनातून शनिवारी पूर्वीची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठवण्यात आली. ठाकरे सरकारने पाठविलेल्या यादीला राज्यपालांनी दोन वर्षे मान्यता दिली नव्हती. मात्र, शिंदे यांच्या शिफारशीला प्रतिसाद देत ठाकरे सरकारची १२ जणांची यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली. राजभवनातील या घडामोडींच्या नंतर आता, राष्ट्रवादीचे महेश तपास आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी या प्रकारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

असे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नाही!

"उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मुख्यमंत्र्यांचा उजवा हात म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख असताना त्यांनीच सरकारमध्ये बंड घडवून आणले आणि आता स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. वास्तविक राजकारण हे सद्भावनेतून झाले पाहिजे. राजकारण हे नेहमी विकासाचे असले पाहिजे. तशा प्रकारचे राजकारण झाले तर त्याचा सर्वांनाच आनंद होईल, पण सध्या महाराष्ट्रात सूडाचे राजकारण सुरू झाले आहे. असे सूडबुद्धीने केले जाणारे राजकारण अजिबात योग्य नाही. हे अशा प्रकारचे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नाही", असे स्पष्ट मत नोंदवत तपासे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या कार्यप्रणालीवर टीका केली.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस