लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ई-चालान रद्द करण्याबाबत राज्यभरातील वाहतूकदारांनी पुकारलेला संप गुरुवारी संध्याकाळी मागे घेण्यात आला. समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेणार असून, लवकरच पोलिस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्याचे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानंतर वाहतूकदारांनी हा निर्णय घेतला.
मंत्री सरनाईक यांनी संध्याकाळी मध्यस्थी करीत हा संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. यावेळी म्हणाले, वाहतूकदारांच्या संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूकदार संघटनांची शिखर समिती ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी’च्या सदस्यांशी संवाद साधला. वाहतूकदारांच्या मागण्यांचा शासन विचार करीत असून, संप मागे घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
... म्हणून आंदोलन तात्पुरते मागे, संघटनेचा दावा ई-चलानांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. तसेच या विषयावर चर्चा करण्यासाठी परिवहन विभाग, पोलिस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री सरनाईक यांनी आश्वासनांचा मान राखून ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटी’सह विविध वाहतूक संघटनांनी सुरू असलेले आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
Web Summary : Maharashtra's transport strike against e-challans ended Thursday evening after government assurances of a joint meeting between police, transport officials, and transport organizations. Transport Minister Pratap Sarnaik intervened, conveying Chief Minister Fadnavis's willingness to address demands. The Maharashtra Transporters Action Committee temporarily suspended the strike based on these assurances.
Web Summary : महाराष्ट्र में ई-चालान के खिलाफ परिवहन हड़ताल गुरुवार शाम को समाप्त हो गई, क्योंकि सरकार ने पुलिस, परिवहन अधिकारियों और परिवहन संगठनों के बीच संयुक्त बैठक का आश्वासन दिया। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने हस्तक्षेप किया, मुख्यमंत्री फडणवीस की मांगों को संबोधित करने की इच्छा व्यक्त की। महाराष्ट्र ट्रांसपोर्टर्स एक्शन कमेटी ने इन आश्वासनों के आधार पर अस्थायी रूप से हड़ताल स्थगित कर दी।