शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

भाजप सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले, राजेंद्र गवई यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 6:39 PM

भाजप सरकारच्या काळात राज्यात दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेतून केली.

अमरावती - कोरेगाव भीमा प्रकरण हे मराठा समाजाने पेटविले, असे मनुवादी प्रवृत्तीकडून जाणीवपूर्वकरीत्या पेरले जात आहे. मात्र, मराठा-बौद्ध असा हा वाद नाहीच. मराठा समाज गुन्हेगार असल्याचा एकही पुरावा नाही. मराठा विरुद्ध बौद्ध असा संघर्ष रंगविण्याचे षड्यंत्र या घटनेआडून सुरू असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेतून केली.भाजप सरकारच्या काळात राज्यातील आंबेडकर अनुयायांवरील अत्याचारांमध्ये दखलनीय वाढ झाली आहे. यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे, असे विधान त्यांनी केले. दंगलीमागे कुणाचा हात आहे, हे पोलिसांनी शोधून काढावे. संभाजी (मनोहर) भिडे, मिलिंद एकबोटे हे या घटनेमागे असल्याचा प्रकाश आंबेडकरांनी जो आरोप केला तो सत्य आहे, असा दुजोराही गवई यांनी दिला. कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर भारीप-बहुजप महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात झालेल्या वाक्युद्धाच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र गवई यांनी रिपाइंची भूमिका मांडली. गवई यांच्या मते, आठवले आणि आंबेडकर हे दिग्गज नेते आहेत, यात दुमत नाही. मात्र, रिपाइं ऐक्यासाठी दोघांनीही पुढाकार घेतला तर ते स्वागतार्ह असेल. सूत्र कोणतेही असावे; पण रिपाइंचे ऐक्य ही काळाची गरज आहे. प्रकाश आंबेडकरांशिवाय ते ऐक्य नसेल, असेही गवई म्हणाले. कोरेगाव भीमाप्रकरणी राज्यभर बंद पुकारला. त्यानंतर काही ठिकाणी जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना घडल्यात. हे कृत्य समाजकंटकांनी केले. यात रिपाइं कार्यकर्ता नव्हता, असे गवई यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी निरपराधांवर गुन्हे दाखल करून अन्यायकारक अटकसत्र चालविले आहे. अमरावतीत काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी आपण संबंधित व्यावसायिकांना भेटणार आहोत. रिपाइं हा समता प्रस्थापित करणारा पक्ष असून सलोख्यासाठी पुढाकार घेऊ, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला भाऊसाहेब ढंगारे, वसंतराव गवई, हिमंत ढोले, दीपक सरदार, उमेश इंगळे आदी उपस्थित होते.

रिपाइंची काँग्रेससोबत मैत्रीरिपाइं (गवई गट) हा काँग्रेससोबत राहील. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष विचारसरणीची सोबत करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपण स्वत: निवडणूक लढणार असल्याचे राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र