शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

वाढत्या घटस्फोटामुळे ‘ पत्रिका’ बघण्याकडे सुशिक्षितांचा वाढतोय कल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 10:15 IST

सध्या तरूण-तरूणींसाठी  ‘लग्न’ हा विषय अत्यंत गंभीर बनला आहे. का वाटते तरुणांना पत्रिका महत्वाची.. जाणून घ्या..!

ठळक मुद्देपुरोगामी म्हणविल्या जाणा-या महाराष्ट्रात पत्रिकांचा अवैज्ञानिक आधार

नम्रता फडणीस

पुणे : समाजातील घटस्फोटांचे वाढते प्रमाण पाहिल्यानंतर सुशिक्षित कुटुंबांना भविष्यात मुलामुलींची लग्न टिकतील की नाही याचीच आता धास्ती वाटू लागली आहे. मन जुळण्यासाठी दोघांचे गुण जुळणे आवश्यक असल्याने सुशिक्षित तरूण-तरूणींचा ओढा पत्रिका पाहण्याकडे वाढला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकविसाव्या शतकात लग्न ठरविताना तरूणी-तरूणी आरोग्यदृष्ट्या सुदृढ आहेत की नाही हे पाहण्यापेक्षा पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात पत्रिकांचा अवैज्ञानिक आधार घेतला जातोय, मात्र यामुळे घट्स्फोट रोखले जातील का? असा एक नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

सध्या तरूण-तरूणींसाठी  ‘लग्न’ हा विषय अत्यंत गंभीर बनला आहे. पूर्वीच्या काळी लग्न जमविताना मुलगा-मुलगी एकमेकांना पाहण्याआधी त्यांची पत्रिका जुळते का? हे पाहिले जायचे. मध्यंतरीच्या काळात सुशिक्षित कुटुंबानी पत्रिका बघण्याच्या इतिकर्तव्याला काहीसा फाटा दिला होता. मात्र, आता पुन्हा पत्रिका बघण्याचा ‘ट्रेंड’ सुशिक्षित कुटुंबामध्ये जोर धरू लागला आहे. दोघांचे किती गुण जुळतायत? नाडी एक तर नाही ना? षडाष्टक योग तर नाही ना? अशा चर्चा कुटुंबांमध्ये ऐकायला मिळत आहेत. लग्न ठरविताना दोघांचे मनोमिलन होईल की नाही, त्यांच्यात भविष्यात वादविवाद तर होणार नाहीत ना? याचीच अनेक सुशिक्षित कुटुंबाना काळजी सतावू लागली आहे. समाजात वाढत असलेले घट्स्फोटाचे प्रमाण हे यामागचे प्रमुख कारण आहे . मुली नोकरीनिमित्त घराबाहेर पडल्याने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आले आहे. त्यामुळे त्या कोणत्याही प्रकारे नव-याशी तडजोड करण्यास तयार नाहीत. त्यामुळे दोघांच्यातील वाद विकोपाला गेले की एका झटक्यात घटस्फोटाचा मार्ग दोघांपैकी एकाकडून स्वीकारला जात आहे. त्यामुळे भविष्यात ही घट्स्फोटाची जखम होऊ नये आणि ती लग्नाला मारक ठरू नये यासाठी सुशिक्षित कुटुंबांनी पत्रिकेचा आधार घेतला असल्याचे ज्योतिष अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. मात्र पत्रिका बघूनही अनेकांचे घटस्फोट झाले आहेत अशी अनेक उदाहरणे आहेत. मग त्याचे काय? पत्रिका त्यांचे घटस्फोट का रोखू शकली नाही?असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उपस्थित  केला आहे. घटना 1 

दोघं एकमेकांना आवडली. मात्र दोघांच्या पत्रिका बघायच्या असा दोन्हीकडच्या कुटुंबियांचा अट्टहास होता. पत्रिका दाखविल्यानंतर मुलाचे आयुष्य अल्प आहे. तो फारकाळ जगणार नाही असे ज्योतिषांनी पत्रिका बघून सांगितले. त्यानंतर तो मुलगा सहा महिन्यातच वारला असल्याचे एका कुटुंबाकडून सांगण्यात आले. वाढत्या घटस्फोटांमुळे पत्रिका बघण्याकडे सुशिक्षितांचा ओढा वाढला हे खरं आहे. पूर्वीच्या काळी महिला जास्त शिकलेल्या नसायच्या. त्यामुळे त्या तडजोड करून लग्न टिकवायच्या. मात्र आता मुली स्वत: नोकरी करू लागल्या आहेत. त्यांना आर्थिक स्थैर्य मिळत आहे. तडजोडपणाची वृत्ती राहिलेली नाही. हेच घटस्फोटाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे लग्नाचा विचार करताना पत्रिका पाहून मन जुळतील की नाही? मतभेद तर होणार नाहीत ना? हे जाणून घेण्यासाठी पत्रिका पाहण्यावर जोर दिला जात आहे- चंद्रकांत शेवाळे, प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ

लग्न जुळविताना पत्रिकेच्या माध्यमातून किमान मुलभूत गोष्टी पाहायल्या हव्यात या मताचा मी आहे. त्यामध्ये दोघांची नाडी एकच नाही ना? गुण किती जुळतात? किमान 18 गुण जुळतात का? हे पाहिले गेले पाहिजे. मुलीच्या पत्रिकेत कोणता प्रॉब्लेम नाही ना? ज्याने भविष्यात कोणत्या अडचणी येतील. हे पाहायला हवे. काही थोड्याफार तडजोडी या कराव्याच लागतात. पण घटस्फोटापर्यंत गोष्टी जाणार नाहीत ना? हे किमान जाणून घ्यायला हवं- सूरज पानसे, तरूण.......................

मुळात ज्यांचा घटस्फोट झालाय त्यांनी पत्रिका पाहिल्या होत्या का ? याचे सवर््हेक्षण करायला हवे. पत्रिका पाहिल्यानंतरही अनेक जोडप्यांचे घटस्फोट झाल्याची  अनेक उदाहरणे आहेत. पत्रिकेपेक्षाही स्वभाव जुळणे आवश्यक आहे. दोघेही आरोग्यदृष्ट्या सुदृढ आहेत का नाही? हे पाहायला हवे. लग्न जुळविताना पत्रिका पाहाणे हे पूर्णत: अवैज्ञानिक आहे-  डॉ. मिलिंद देशमुख, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेmarriageलग्न