शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

वाढलेल्या तापमानामुळे हापूस आंब्याचे उत्पादन घटले

By admin | Published: March 25, 2017 2:22 AM

नवी मुंबईच्या बाजारात दरवर्षी सर्वप्रथम हापूस आंबा पाठविणाऱ्या अलिबाग तालुक्यातील खारेपाट भुवनेश्वर परिसरात यंदा वाढलेल्या तापमानामुळे फळधारणाच मुळात कमी झाल्याने

जयंत धुळप / अलिबागनवी मुंबईच्या बाजारात दरवर्षी सर्वप्रथम हापूस आंबा पाठविणाऱ्या अलिबाग तालुक्यातील खारेपाट भुवनेश्वर परिसरात यंदा वाढलेल्या तापमानामुळे फळधारणाच मुळात कमी झाल्याने हापूस आंब्याच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती आंबा बागायतदार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे.खारेपाट भुवनेश्वर परिसरातून दरवर्षी दररोज सुमारे दोन हजार टन हापूस आंबा नवी मुंबई बाजारामध्ये जात होता. या वर्षी चांगला मोहोर आला. परंतु, फेब्रुवारीत अचानक वाढलेल्या तापमानामुळे तो गळून फळधारणा अत्यंत कमी झाली आहे. दरवर्षीची परंपरा अबाधित राखून अलिबागच्या खारेपाटातील काही शेतकऱ्यांचा आंबा फेब्रुवारी महिन्यापासूनच नवी मुंबईच्या बाजारपेठेत जाऊ लागला आहे. परंतु, शेवटच्या मोहोराला फळ कमी झाल्यामुळे मे महिन्यात आंब्याचा तुटवडा भासणार, अशी शक्यता आंबा बागायतदार डॉ. पाटील व मारुती मास्तर यांनी व्यक्त केली. शासनाने आंबा बागायतदार व भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा. कारण, हमी भाव मिळत नाही तेव्हा शेतकऱ्यांना उत्पादित माल रस्त्यावर टाकण्याची वेळ येते. त्यामुळेच शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी मारुती मास्तर यांनी केली.