शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आयारामांची गोची; महापुरामुळे पक्षांतरावर लागला 'ब्रेक'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 4:54 PM

राष्ट्रवादी नेते बार्शीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. तर भाजपच्या महाजनादेश यात्रेत सोलापुरातील काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु, महापूर आणि त्यात महाजनादेश यात्रा रद्द झाल्याने पक्षांतरवर मोठा ब्रेक लागला आहे.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ३० हून अधिक नेत्यांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. यापैकी सर्वाधिक नेत्यांनी भाजप गाठले. परंतु, या पक्षांतराला गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे हे पक्षांतर थांबले आहे.

सांगली, कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरस्थितीच्या वेळी राजकारण करू पाहणाऱ्या राजकीय पक्षांवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येते. भाजपच्या महाजनादेश, शिवसेनेच्या जनआशीर्वाद आणि राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा देखील महापुराच्या पार्श्वभूमीवर रोखण्यात आल्या. नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत राजकीय हालचाल करणे महाग पडू शकते, यामुळे सत्ताधारी पक्षांसह विरोधीपक्ष काळजी घेत आहे. त्यानुसार सध्या पक्षांतर थांबले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील आणखी ५० नेते भाजपमध्ये सामील होणार असल्याचा दावा काही दिवसांपूर्वीच करण्यात आला होता. पक्षांतराचा पहिला टप्पा पार पडला असून लवकरच दुसरा टप्पा होणार आहे. या टप्प्यात किमान ५० नेते भाजप आणि शिवसेनेत येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, राज्यातील पूरस्थितीमुळे या नेत्यांनीही पक्षांतर करण्यास उसंत घेतली आहे. जेणेकरून सोशल मीडियातून आपल्यावर टीका होणार नाही. किंबहुना सत्ताधारी पक्षांकडूनही या आयारामांना सबुरीचा सल्ला दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी नेते बार्शीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. तर भाजपच्या महाजनादेश यात्रेत सोलापुरातील काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु, महापूर आणि त्यात महाजनादेश यात्रा रद्द झाल्याने पक्षांतरवर मोठा ब्रेक लागला आहे.